शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

‘तृणमूल’च्या बालेकिल्ल्याला पाडले खिंडार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 03:52 IST

लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात मिळालेल्या प्रचंड यशामुळे भाजप सुखावणे स्वाभाविक आहे.

- समीर परांजपेलोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात मिळालेल्या प्रचंड यशामुळे भाजप सुखावणे स्वाभाविक आहे. मात्र पश्चिम बंगालमधील यशामुळे या पक्षाचा आनंद नक्कीच द्विगुणित झाला आहे. या राज्यातील ४२ पैकी १८ लोकसभा जागांवर विजय मिळवून भाजपने तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. तृणमूल काँग्रेसला २२ जागांवर विजय मिळाला आहे. तृणमूल काँग्रेसला ४३.२८ टक्के तर भाजपला ४०.२५ टक्के मते मिळाली आहेत.२०१४च्या लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांच्या आघाडीने लोकसभेच्या केवळ दोन जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.शिवप्रकाश पश्चिम बंगालमध्ये भाजपची संघटना बळकट करत असतानाच राजकीय आघाडी कैलाश विजयवर्गीय यांनी सांभाळली. ममता बॅनर्जी यांच्या कारभाराचे वाभाडे काढण्याची कामगिरी त्यांनी चोखपणे बजावली. माजी रेल्वेमंत्री मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसमधून २०१७ साली भाजपत आले ही मोठी घटना होती. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या आमदार, खासदार, नेत्यांसह बारा-तेरा जणांना भाजपमध्ये सामील करून घेण्यात आले. ममता बॅनर्जी यांचा एककल्ली स्वभाव व कारभार याला बंगालमधील अनेक लोक कंटाळले होते. डावी आघाडी, काँग्रेस मरगळलेले असल्याने त्यांना तृणमूल काँग्रेसविरोधात एक सशक्त पर्याय हवा होता. २८ मार्च ते १ मे या कालावधीत बंगालमध्ये मोदींच्या १० तर शहांच्या ११ सभा पार पडल्या.कोलकातामध्ये अमित शहा यांच्या रॅलीमध्ये जो हिंसाचार झाला ती उंटावरील शेवटची काडी ठरली. तृणमूल काँग्रेस व भाजपने एकमेकांवर हिंसाचार घडविल्याचे आरोप केले असले तरी मतदार वस्तुस्थिती जाणून होता. त्याने तृणमूल काँग्रेसला जिव्हारी बसेल असा फटका दिला.भाजपचे संघटन पश्चिम बंगालमध्ये मजबूत करण्याची कामगिरी त्या पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते शिवप्रकाश यांच्यावर २०१५ साली सोपविण्यात आली.पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली एकेक पाऊल उचलण्यात येत होते. त्यानंतरच्या तीन वर्षांत या राज्यामध्ये भाजपच्या मंडलांची संख्या ४१५हून १२८०पर्यंत वाढविण्यात आली.उत्तर बंग, नवदीप, रार बंग, हुगळी मिदनापूर, कोलकाता अशा पाच विभागांत पक्षवाढीसाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले. या कामात संघाचे स्वयंसेवक अरविंद मेनन, ओडिशाचे भाजप नेते सुरेश पुजारी यांचाही सिंहाचा वाटा होता. पण त्याचा गवगवा करणे भाजपने टाळले.>विधानसभेतहीकडवे आव्हाननिवडणुकांत मतांच्या टक्केवारीचे प्रमाण पाहिले तर पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघांपैकी १६४ मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेसला चांगली मते मिळाली आहेत. भाजपने १२१ विधानसभा मतदारसंघांत मतांची उत्तम बेगमी केली आहे. हे आकडे लक्षात घेता या राज्यात २०२१ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत तृणमूल काँग्रेसचा भाजप हाच मुख्य प्रतिस्पर्धी असेल हे स्पष्ट होते. ग्रामीण भागांबरोबरच शहरी भागांमध्येही भाजप व तृणमूलमध्ये कडवी लढत झाली.>मै नही मानतीसांप्रदायिकता के रंग मे मुझे नही है विश्वाससभी धर्मोमे है उग्रता, नम्रतामै हूं नम्र जागरण की एक सहिष्णू सेविकाउत्थान हुआ जिसका बंगाल मेविश्वास नही मुझे सामयिक उग्र धर्म बेचने मेमेरा विश्वास है मानवता धर्म केआलोक से आलोकित धर्म मेधर्म बेचना है जिनका ताशधर्म पहाड पर है पैसोंका वास?मै रत हूं नीज कर्मोंमेकर्महीन हो तूम सब!इसलिए बिकता है उग्रता धर्म?विश्वास है जिन्हे सहिष्णूता मेआइए जाग्रत कीजिएसमवेत सभी आइएजब वसुधैव कुटुंबकम्तो क्यो है हिसाब-किताब?उग्रता है जिसकी अभिलाषममता बॅनर्जी एक राजकारणी आहेत. तसेच त्या कवयित्री, चित्रकार आणि संगीतज्ञसुद्धा आहेत. निवडणुकांच्या निकालापूर्वी त्यांनी फेसबुकवर स्वत:चा सिंथेसायझर वाजवित असलेला व्हिडीओसुद्धा शेअर केला होता. ‘राजनीती’ शीर्षकाची त्यांची एक कविता खूप चर्चेत होती. ‘मै नही मानती’ या त्यांच्या कवितेवर सुमारे ७ हजार लाइक्स मिळाल्या असून १ हजाराहून अधिक ‘नेटिझन्स’नी या कवितेबद्दल ‘रिट्विट’ केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९West Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Mamata Banerjeeममता बॅनर्जी