शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भाजपने १६३ जागांवर तैनात केले दिग्गज नेते; रायबरेली, अमेठीमध्ये सोशल इंजिनीअरिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 07:23 IST

अंतिम तीन टप्प्यांतील सर्व जागा जिंकण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली आहे.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :  भारतीय जनता पक्षाने शेवटच्या तीन टप्प्यात लोकसभेच्या १६३ जागांवर दिग्गज नेत्यांची नियुक्ती करून जागा जिंकण्याची जबाबदारी दिली आहे. या सर्व जागांवर जातीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवून नेत्यांना तैनात केले आहे.

अंतिम तीन टप्प्यांतील सर्व जागा जिंकण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली आहे. निवडणुका झालेल्या १८ राज्यांतील नेत्यांना उर्वरित जागांवर पाठविले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव, भजनलाल शर्मा, हेमंत बिस्वा सरमा, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकच्या नेत्यांना या जागाी तैनात केले आहे. 

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यावरही जबाबदारी

भाजपने अमेठी आणि रायबरेलीमध्ये सोशल इंजिनिअरिंगचे मास्टर नेते पाठवले आहेत. केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल यांना मायक्रो मॅनेजमेंटसाठी अमेठी आणि रायबरेलीमध्ये पाठविले आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनाही अमेठी-रायबरेलीमध्ये अधिक वेळ देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अमेठीमध्ये ओबीसी आणि मौर्य यांची संख्या मोठी आहे. रायबरेली आणि अमेठीच्या ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांना पाठविण्यात आले आहे. रायबरेलीत ब्राह्मण मोठ्या संख्येने आहेत आणि राजपूतही मोठ्या संख्येने आहेत. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपा