शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

चीनने भारताच्या ४ हजार चौरस किमी जागेवर अतिक्रमण केले; सुब्रमण्यम स्वामींची हायकोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 17:08 IST

Subramanian Swamy: पंतप्रधान मोदी चीनच्या मुद्द्यावर मौन बाळगत असल्यासंदर्भात विरोधकांसह आता भाजपमधील नेते विचारणा करू लागले आहेत.

Subramanian Swamy: गेल्या काही वर्षापासून भारत आणि चीन या दोन देशांमध्ये लडाख येथील सीमेवरून तीव्र संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर तोडगा काढण्याचा दोन्ही देशांकडून प्रयत्न केला जात आहे. चीनच्या मुद्द्यावरून विरोधक केंद्र सरकारला चांगलेच कोंडीत पकडण्याचा सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. यातच आता भाजपमधूनही चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनाबाबत प्रश्न विचारले जात आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली आहे. पंतप्रधान भारतातील विरोधी पक्षांवर हल्लाबोल करतात. मात्र चीनचे नाव घेताच त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नाही. चीनने आमच्या हजारो चौरस किलोमीटर जमिनीवर कब्जा केला आहे. यावर पंतप्रधान मोदी अजूनही एक शब्दही बोलू शकत नाहीत, या शब्दांत स्वामी यांनी निशाणा साधला.

चीनकडून ४ हजार चौरस किलोमीटर जमिनीवर अतिक्रमण

चीनच्या मुद्द्यावर स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. चीनने ४ हजार चौरस किलोमीटर जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप स्वामी यांनी आपल्या याचिकेत केला आहे. याचिकेवर उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तरही मागवले आहे. दुसरीकडे, सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावरही टीका केली आहे. परराष्ट्रमंत्री यांचा काही उपयोग नाही. ते फक्त आपल्या मालकांची भाषा बोलतात, अशी टीका केली होती. 

दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी हे एकेकाळी जनता दलाचे मोठे नेते होते. मात्र, नंतर भाजपच्या हिंदुत्ववादी धोरणांनी प्रभावित होऊन पक्षात प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेचे तिकीटही दिले. स्वामींचा कार्यकाळ संपल्यावर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी पुन्हा राज्यसभेवर पाठवले नाही. 

 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीindia china faceoffभारत-चीन तणाव