शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

भाजपचे मिशन २०२४ : विरोधी पक्षांच्या एकजुटीत फूट पाडण्याचा फॉर्म्युला; खास रणनीतीवर काम करू शकते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 8:31 AM

उत्तर प्रदेश-पंजाबपासून दक्षिण भारतापर्यंत भाजप त्या पक्षांशी युती करण्याचा प्रयत्न करू शकते, जे अजूनही विरोधी ऐक्यापासून दूर आहेत.

नवी दिल्ली : आगामी वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात लढण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. अलीकडेच पाटणा येथे विरोधी पक्षांची एक बैठक झाली. या बैठकीत २० हून अधिक विरोधी पक्ष सहभागी झाले होते. मात्र आता भाजपने विरोधी पक्षांची एकजूट तोडण्याचा फॉर्म्युला शोधला असल्याचे म्हटले आहे. यासाठी भाजप विशेष रणनीतीवर काम करू शकते. 

उत्तर प्रदेश-पंजाबपासून दक्षिण भारतापर्यंत भाजप त्या पक्षांशी युती करण्याचा प्रयत्न करू शकते, जे अजूनही विरोधी ऐक्यापासून दूर आहेत. एका विशेष रणनीती अंतर्गत, भाजप देशभरातील सर्व ५४३ लोकसभा जागांवर लक्ष ठेवण्यासाठी तीन झोन तयार करू शकते आणि त्या सर्वांचे वेगवेगळे प्रभारी असतील. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ज्या पक्षाची कामगिरी चांगली आहे, त्यांना सरकार स्थापन करणे सोपे जाते, असे म्हटले जाते. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा ओमप्रकाश राजभर यांचा पक्ष एसबीएसपीसोबत हातमिळवणी करू शकतो. दोघेही जुने मित्र आहेत. याचा फायदा पूर्वांचलमध्ये भाजपला होऊ शकतो. 

भाजप बिहारमध्ये मांझी, व्हीआयपी पक्षाचे मुकेश साहनी आणि रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांना आपल्यासोबत घेऊ शकते. दरम्यान, चिराग पासवान यांचे काका आधीच एलजेपी कोट्यातून एनडीएमध्ये मंत्री आहेत. अशाप्रकारे भाजप बिहारमध्ये नितीश-लालूंच्या विरोधात घेराव घालणार आहे. याचबरोबर, दक्षिणेत कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावल्याने आता भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत फारसे नुकसान होणार नाही, यासाठी देवेगौडांच्या पक्ष जेडीएसशी हातमिळवणी करू शकते. भाजप आणि जेडीएस एकत्र आल्यास कर्नाटकात त्यांचे मताधिक्य ५० टक्क्यांच्या जवळपास पोहोचू शकतो. 

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये ताकदीसाठी भाजप चंद्राबाबू नायड यांच्या पक्ष टीडीपीसोबत येऊ शकतो. दोघांची यापूर्वी युती आहे. टीडीपीसोबत युती केल्यास आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यात भाजपची ताकद वाढू शकते. भाजप पुन्हा एकदा आपला जुना भागीदार शिरोमणी अकाली दल (एसएडी) सोबत एकत्र येऊ शकतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये समझोता होण्याची शक्यता आहे, कारण भाजपला पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपच्या आव्हानावर मात करायची असेल तर अकालींचा पाठिंबा प्रभावी ठरू शकतो. तसेच, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि दक्षिणमधून भाजपला जास्त जागा मिळाल्या तर बहुमताचा २७२ चा आकडा पार करणे फारसे अवघड जाणार नाही.

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक