शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
2
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
3
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
4
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
5
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
6
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
7
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
8
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
9
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
10
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
11
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
12
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
13
'लकी गर्ल'! भर रस्त्यात Rohit Sharma नं दिला चाहतीच्या हातात हात; अन्... VIDEO
14
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
15
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
16
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
17
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
18
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
19
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
20
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा

"मोदी तेरा कमल खिलेगा..."; खरी ठरली PM यांची भविष्यवाणी, त्रिपुरासह तीन राज्यांत मोठा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 2:56 PM

पंतप्रधानांची ही भविष्यवाणी आता खरी ठरताना दिसत आहे...

मेघालयची राजधानी शिलाँग येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते, विरोधक 'मर जा मोदी-मर जा मोदी' म्हणत आहेत, पण जनता 'मोदी तेरा कमल खिलेगा', म्हणत आहे. पंतप्रधानांची ही भविष्यवाणी आता खरी ठरताना दिसत आहे. त्रिपुरामध्ये भाजप 32 जागांवर आघाडीवर असून पुन्हा एकदा सरकार स्थापन करताना दिसत आहे. याशिवाय नागालँडमध्येही भाजप 12 जागांवर आघाडीवर आहे, यांपैकी 2 जागा जिंकल्या आहेत. याच बरोबर मेघालयात सामना अडकला आहे. येथे एकूण 60 जागा आहेत. NPP जवळपास 24 जागांवर आघाडीवर आहे, हा आकडा बहुमतापेक्षा बराच दूर आहे. अशा स्थितीत एनपीपी भाजपसोबत 5 जागा आणि इतर काही जागांसह सरकार स्थापन करू शकते.

यापूर्वीही भाजप एनपीपी सरकारचा भाग होता. अशा प्रकारे या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचा सत्तेत वाटा असेल. मतांचा विचार करता, यातही भाजपची स्थिती अत्यंत चांगली आहे. एकेकाळी भाजप ईशान्येकडील राज्यांमध्ये सर्वात कमकुवत पक्ष समजला जात होता. याळेवी भाजपला त्रिपुरामध्ये 39 टक्के मते मिळाली आहेत. नागालँडमध्येही 18 टक्के लोकांनी भाजपला पसंती दिली आहे. याशिवाय मेघालयातही 8 टक्के मते भाजपच्या खात्यात जात आहेत. मेघालयात टीएमसीलाही 5 जागा मिळू शकतात. पण त्यांना सत्तेपासून दूरच रहावे लागेल. दरम्यान, एनपीपीचे कोनराड संगमा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त आहे. अशा स्थितीत दोघे मिळून सरकार स्थापन करू शकतात.

भाजपसाठी त्रिपुराचा विजय हा सर्वात महत्त्वाचा असेल. 2018 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजपला, यापूर्वी येथे तुरळकच यश मिळायचे. पण गेल्या 5 वर्षांपूर्वी भाजपने येथे पहिल्यांदाच सरकार स्थापन केले. अशा स्थितीत येथे पुन्हा एकदा सत्तेवर येणे भाजपसाठी मोठी गोष्ट आहे. बंगाली आणि आदिवासी समाज मोठ्या संख्येने असलेल्या त्रिपुरामध्ये भाजपचा विजय देशभरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषत: आदिवासीबहुल भागात भाजपला याचा फायदा होऊ शकतो. आदिवासींची लोकसंख्या १ कोटीहून अधिक असलेल्या मध्य प्रदेशात याच वर्षी निवडणुका होत आहेत. येथे भाजप त्रिपुराच्या विजयाचा उल्लेख करून आदिवासी मतांना आपल्याकडे आर्षित करू शकते.

टॅग्स :ElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाTripuraत्रिपुरा