शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

भाजपाकडून देशातील जनतेचा आवाज दाबला जातोय, CAA विरोधातील आंदोलनावरून सोनिया गांधींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 7:23 PM

Citizen Amendment Act Protest : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात रणकंदन माजले आहे.

नवी दिल्ली - नुकत्याच अस्तित्वात आलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात रणकंदन माजले आहे. या कायद्याविरोधात एकीकडे मोठमोठे मोर्चे निघत असताना दुसरीकडे या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून केंद्रातील सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली आहे. जनतेला सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. मात्र सरकार त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा आवाज क्रूरपणे दाबत आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी आपल्या व्हिडीओ संदेशातून केला आहे. 

सोनिया गांधी म्हणाल्या की, ''भाजपाचे सरकार देशभरातील विद्यार्थी आणि जनतेकडून करण्यात येत असलेले आंदोलन ज्या प्रकारे दाबत आहे ते पाहून काँग्रेस पक्ष चिंतीत झाल आहे. देशभरातील विद्यापीठे, आयआयटी, आयआयएम आणि अन्य आघाडीच्या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी भाजपा सरकारच्या फुटिरतावादी आणि लोकविरोधी धोरणांविरोधात उत्स्फूर्तपणे आंदोलन करत आहेत. लोकशाहीमध्ये चुकीच्या निर्णयांविरोधात आवाज उठवण्याचा आणि चिंता व्यक्त करण्याचा नागरिकांना हक्क आहे, लोकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करणे ही सरकारची जबाबदारी आहे.  ''हे सरकार विरोधकांच्या आवाजाची गळचेपी करण्यासाठी निर्दयतेने बलप्रयोग करत आहे. ही बाब लोकशाही व्यवस्थेमध्ये अस्वीकारार्ह आहे. काँग्रेस पक्ष भाजपा सरकारकडून करण्यात आलेल्या या कारवाईचा निषेध नोंदवतो. तसेच विद्यार्थी आणि जनतेच्या संघर्षामध्ये काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत असेल.   नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून गेल्या काही दिवसांत सुरू झालेल्या हिंसाचाराचे सत्र आजही सुरू राहिले. त्यात काही आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. तसेच आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना बलप्रयोग करावा लागत आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण