शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

घोड्यांसोबत गाढवाची शर्यत! भाजप मंत्र्याचा राहुल गांधींवर हल्लाबोल, केली बोचरी टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2023 4:03 PM

"अशा प्रकारचा मेलोड्रामा करायची आवश्यकता नाही. देशातील जनता स्वतःच त्याचा निर्यण करतील. त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली आहे. यामुळे प्रक्रियेचे पालन करण्यात आले आहे."

मानहानी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. यानंतर देशातील राजकारण जबरदस्त तापले आहे. विरोधक मोदी सरकारवर हुकूमशाहीचा आरोप करत देशभरात निषेध करत आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर बोचऱ्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. घोड्यांबरोबर गाढवांची शर्यत लावली जात असल्याचे ते म्हणाले. खरे तर, सोमवारी संसदेत प्रवेश करताना पत्रकारांनी त्यांना विरोधकांच्या निदर्शनासंदर्भात प्रश्न केला असता, हरदीप सिंग पुरी म्हणाले, कुठे प्रभू रामचंद्र आणि कुठे हे लोक...

राहुल गांधींसंदर्भात बोलताना पुरी म्हणाले, ते म्हणतात की मी सावरकर नाही, म्हणून मी माफी मागणार नाही. आपल्याला माहीत आहे, सावरकरजींचे योगदान काय आहे? हे जसे काही घोड्यांसोबत गाढवाची शर्यत सुरू आहे, असे चालले आहे. एवढेच नाही, तर कायदा व्यवस्था, राजकारणात काय चातले आणि काय चालत नाही, यावर या लोकांनी गांभीर्याने आत्ममंथन करायला हवे. अशा प्रकारचा मेलोड्रामा करायची आवश्यकता नाही. देशातील जनता स्वतःच त्याचा निर्यण करतील. त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली आहे. यामुळे प्रक्रियेचे पालन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. 

जर लोकशाहीत न्यायालयाने काही निर्णय दिला असेल तर, त्यावर महाभारत करण्याची कारण काय आहे? असा सवालही पुरी यांनी केला. तत्पूर्वी, 'मोदी' आडणावावरून टिप्पणी केल्याबद्दल राहुल गांधी यांना गुजरातमधील सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर राहुल गांधी यांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांचे संसदेतील सदस्यत्व गेले आहे. विरोधक याला षड्यंत्र आणि सत्तेचा दुरुपयोग म्हणत आहेत. याच बरोबर, राहुल गांधी यांनीही आपण माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस