शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

भाजपला २४०पेक्षा जास्त; तर काँग्रेसला १४०हून अधिक जागा जिंकण्याचा आत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 07:08 IST

लोकसभा निवडणुकांच्या आतापर्यंत पार पडलेल्या पाच टप्प्यांमध्ये २६ राज्यांतील ४२५ जागांसाठी मतदान झाले आहे. नेमक्या किती जागा जिंकणार याबद्दलचे अंदाज काँग्रेस व भाजपच्या वॉररुममध्ये लढविले जात आहेत.

- हरिश गुप्तानवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या आतापर्यंत पार पडलेल्या पाच टप्प्यांमध्ये २६ राज्यांतील ४२५ जागांसाठी मतदान झाले आहे. नेमक्या किती जागा जिंकणार याबद्दलचे अंदाज काँग्रेस व भाजपच्या वॉररुममध्ये लढविले जात आहेत. २४० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल असा दावा भाजपच्या सूत्रांनी केला असून १४०हून जास्त जागा जिंकण्याचा काँग्रेसला विश्वास आहे.दिल्लीतील दिनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजपच्या मुख्यालयामध्ये त्या पक्षाची तर गुरुद्वारा रकबगंज मार्गावर काँग्रेसची वॉररुम आहे. भाजपच्या वॉररुममध्ये काम करणारे ५५ जण विविध मतदारसंघांतील मतदानाचे प्रमाण व अन्य बाबींचे अहोरात्र विश्लेषण करत आहेत. त्यातून भाजपला किती जागांवर विजय मिळेल याचा अंदाज बांधता जाईल. भाजपच्या वॉररुममधील लोक याआधी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्याने आता वॉररुममधील कामकाजावर अमित शहा लक्ष ठेवून आहेत. एनडीएतील घटक पक्ष लढवत असलेल्या जागांवर झालेले मतदान व तेथील स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी भाजपच्या वॉररुममध्ये स्वतंत्र विभाग आहे. रा. स्व. संघाच्या हजारो स्वयंसेवकांकडूनही माहिती मागविली जात आहे.२०१४मध्ये भाजपला २८२ जागांवर विजय मिळाला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकांत यापेक्षा जास्त जागा जिंकणार असा दावा भाजप करत असला तरी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये पक्षाला फटका बसेल अशी चर्चा त्या पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात आहे.मात्र ही उणीव पश्चिम बंगाल, कर्नाटक, हरयाणा या राज्यांत मिळू शकणाऱ्या यशामुळे भरून निघेल असे भाजपला वाटते.महाराष्टÑात काँग्रेसला ११ ते १३ जागा ?उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात प्रत्येकी ११ ते १३ जागा मिळतील असे काँग्रेसला वाटत आहे. राजस्थानमध्ये १५, मध्य प्रदेशमध्ये १४, छत्तीसगढमध्ये ८, पंजाबमध्ये ८ ते ९, आसाममध्ये ६ ते ७, गुजरातमध्ये ६ इतक्या जागांवर विजय मिळेल असा त्या पक्षाला विश्वास आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा