शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

मोदींच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था मजबूत : भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 17:44 IST

चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी ५ वर आला आहे. यानंतर मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त करताना मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे हे झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत असल्याचा माजी पंतप्रधान आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांचा आरोप भारतीय जनता पक्षाने फेटाळून लावला आहे. तसेच मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार आणि राजकीय घराणेशाहीमुळे अर्थ व्यवस्थेला मोठा धक्का बसल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अर्थ व्यवस्थेला मजबूत आधार मिळाला आहे. तसेच जागतिक पातळीवर भारताची विश्वसार्हता वाढल्याचे पात्रा यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, मनमोहन सिंग माजी पंतप्रधान असून वयाने मोठे आहेत. परंतु, त्यांच्या १० वर्षांच्या कालखंडात भारताची ज्या प्रमाणात प्रगती व्हायला हवी होती, ती होऊ शकली नाही. मनमोहन सिंग अर्थतज्ज्ञ होते, परंतु, ज्या लोकांनी त्यांना पडद्यामागून निर्देश दिले ते लोक भ्रष्टाचारात अलिप्त होते. त्या लोकांमुळे घराणेशाहीला वाव मिळाला आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले.

दरम्यान मोदींच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेला मजबूत आधार मिळाला असून जगात आपल्या अर्थव्यवस्थेची विश्वासार्हता वाढली आहे. भारताची अर्थव्यवस्था जागतीक पातळीवर पाचव्या स्थानी पोहोचली आहे. त्यातच अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी नुकत्याच केलेल्या घोषणांमुळे अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल, असा दावा पात्रा यांनी केला.

चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी ५ वर आला आहे. यानंतर मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त करताना मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे हे झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.