शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

"ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची अधोगतीकडे वाटचाल"; अमित शाह यांची टीका

By देवेश फडके | Updated: January 31, 2021 15:50 IST

आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून अमित शाह यांनी हावडा येथील एका रॅलीला संबोधित केले.

ठळक मुद्देअमित शाह यांची ममता बॅनर्जींवर जोरदार टीकादूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून केले हावडा येथील रॅलीला संबोधितकागदी घोडे नाचवून काही फायदा नाही - अमित शाह

नवी दिल्ली :ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची वाटचाल अधोगतीकडे झाली. राज्याचा विकास करण्याचे सोडून ममता बॅनर्जींमुळेपश्चिम बंगाल अन्य राज्यांच्या तुलनेत मागे पडले, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून अमित शाह यांनी हावडा येथील एका रॅलीला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते. 

ममता दीदी पश्चिम बंगालच्या जनतेला आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळू देत नाही. कारण ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार येताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव आणून पश्चिम बंगालमधील जनतेला या योजनेचा लाभ मिळवून देऊ, असे आश्वासन अमित शाह यांनी यावेळी दिले. 

कागदी घोडे नाचवून काही फायदा नाही

ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी आमच्याकडे एक कागद पाठवला होता. त्यात पश्चिम बंगालमध्ये शेतकरी सन्मान योजना लागू करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. मात्र, केवळ कागदी घोडे नाचवून काही फायदा नाही. बंगाली जनतेला मुर्ख बनवण्याचे काम ममता बॅनर्जी करत आहेत. केवळ एका कागदाने काही होत नाही. त्यासोबत शेतकऱ्यांची यादी पाठवायला हवी. बँक खात्यांचा तपशील हवा. यापैकी काहीच पाठवले नाही, असा दावा शाह यांनी केला. 

घुसखोरांना ममता दीदींची फूस

ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या भूमिला रक्तरंजित केले. बंगालमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना ममता बॅनर्जी यांची फूस असल्याचा घणाघात शाह यांनी केला. या घुसखोरांना पश्चिम बंगालचे नुकसान करू देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच याला रोखू शकते, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

'राष्ट्रध्वजाचा अपमान केला त्याला अटक करा', राकेश टिकैत यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

ममता बॅनर्जी एकट्या पडणार

विधानसभा निवडणुकाची चाहूल लागताच तृणमूल काँग्रेसमधील अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. निवडणूक निकालानंतरही हे चित्र असेच राहील. शेवटी ममता बॅनर्जी एकट्या पडतील, असा दावा शाह यांनी केला. डाव्या पक्षांची साथ सोडून ममता बॅनर्जी यांनी दहा वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली. 'माटी माटी मानुष' असा नाराही देत पश्चिम बंगालचा चेहरा-मोहरा बदलण्याचे आश्वासन दिले. मग असे काय घडले की, आता मोठ्या प्रमाणावर तृणमूल काँग्रेसला भगदाड पडत आहे, अशी विचारणाही अमित शाह यांनी यावेळी केली.

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची कालावधी जवळ येत चालला आहे, तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. अलीकडेच तृणमूल काँग्रेसला रामराम केलेले माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह अनेक बंडखोर आमदार आणि नेत्यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. 

टॅग्स :Politicsराजकारणwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहाBJPभाजपाtmcठाणे महापालिका