शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कर्नाटकात पुन्हा भाजपमध्ये कलह; मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना हटवण्याची 'शत प्रतिशत' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 13:53 IST

उत्तर भारतानंतर आता दक्षिण भारतातील कर्नाटकमध्येही अशाच प्रकारची मागणी होताना दिसत आहे.

ठळक मुद्देआता कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्याची मागणीसत्ता टिकवायची असेल, तर येडियुरप्पा यांना हटवावेया मुख्यमंत्र्यांसोबत निवडणुकांना सामोरे जाऊ शकत नाही - आमदार

बेंगळुरू: भारतीय जनता पक्षातील (BJP) अंतर्गत वाट पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अलीकडेच भाजपने उत्तराखंडमधील मुख्यमंत्री बदलला होता. उत्तर भारतानंतर आता दक्षिण भारतातील कर्नाटकमध्येही अशाच प्रकारची मागणी होताना दिसत आहे. मुख्यमंत्री येडियुप्पा यांना हटवावे, अशी मागणी भाजप आमदार बसनगौडा यतनाल यांनी केली आहे. (bjp leader basanagouda yatnal demands that cm bs yediyurappa should be changed)

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना १०० टक्के हटवायला हवे, अशी मागणी यतनाल यांनी केली. येडियुरप्पा यांच्यासोबत निवडणुकांच्या प्रचारासाठी जाऊ शकत नाही. भाजपला कर्नाटकात आपला जम कायम करायचा असेल, तर मुख्यमंत्री येडियुप्पा यांना हटवून दुसऱ्या माणसाची नियुक्ती करणे योग्य ठरेल. पक्ष नेतृत्वाला याबाबतची माहिती दिली आहे, असे यतनाल यांनी यावेळी स्पष्ट केले. 

राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल; RSS ला विश्वास

भाजपचे सरकार 

विधानसभा निवडणुकीनंतर जनता दल सेक्युलरसोबत काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. भाजपला दूर ठेवण्यासाठी एचडी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. मात्र, आमदारांच्या असंतोषामुळे काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार कोसळले आणि भाजपने संधीचे सोने करत पुन्हा सरकार स्थापन केले. मात्र, आता मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना हटवण्याची मागणी होऊ लागली आहे. 

दरम्यान, अलीकडेच त्रिवेंद्र सिंह शेखावत यांना बाजूला करून भाजपने तीरथ सिंह रावत यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनवले. उत्तराखंडमधील ही मोठी राजकीय उलथापालथ असल्याचे सांगितले गेले. भाजप उपाध्यक्ष रमण सिंह आणि सरचिटणीस व राज्याचे प्रभारी दुष्यंत गौतम कोणताही नियोजित कार्यक्रम नसताना देहरादून येथे पोहचले होते. राज्याच्या कोअर कमिटीतील नेत्यांसोबत बैठक केली. यानंतर या दोघांनी आपला अहवाल भाजप अध्यक्ष नड्डा यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राजीनामा दिला होता. उत्तराखंडनंतर आता कर्नाटकातून उघडपणे मुख्यमंत्री बदलण्याची मागणी होऊ लागल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या आहेत. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाBengaluruबेंगळूरPoliticsराजकारण