शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

“देशाच्या लष्कराचा अपमान करू नका..,” सर्जिकल स्ट्राईकवरील प्रश्नांवर प्रसाद यांचे काँग्रेसला खडेबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 14:04 IST

“ते सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलत आहेत, पण त्यांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत,” असं वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं होतं.

“काँग्रेस पक्ष वारंवार सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे,” अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी दिली. “हे तेच दिग्विजय सिंह आहेत, ज्यांनी बाटला हाऊस एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित केले होते. माझा राहुल गांधींना प्रश्न आहे, तुमच्यासोबत जे लोक आहेत… ते देश तोडण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्ही शांत आहात? नेत्यांच्या अशा वक्तव्यानं दहशतवाद्यांचं मनोबल वाढतं याचं विचार कधी तुम्ही केलाय का? ही भारत जोडो यात्रा आहे की भारत तोडो?” असं म्हणत रविशंकर प्रसाद यांनी खडेबोल सुनावले.

“हे अत्यंत लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना माफी मागावी लागेल. ही पुरावा गँग देशाला तोडण्याचं काम करतेय आणि या नेत्यांना काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यांचा पाठिंबा आहे. दिग्विजय सिंह हे काही सामान्य नेते नाहीत, ते दहा वर्षे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत, सरचिटणीस होते. देशाच्या सैन्याचा अपमान करू नका,” असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केले होते प्रश्नकाँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी सर्जिकल स्ट्राईकवर पुन्हा प्रश्न उपस्थित केले होते. तसंच सरकार खोटं बोलत असल्याचा आरोपही केला होता. जम्मू आणि काश्मीरमधील 'भारत जोडो यात्रे' दरम्यान एका जाहीर सभेला संबोधित करताना सिंह यांनी आरोप केला की, “सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कर्मचाऱ्यांना श्रीनगरहून दिल्लीला एअरलिफ्ट करण्याची (CRPF) विनंती मान्य केली नाही आणि २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवानांना बलिदान द्यावे लागले.”

“ते सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलतात. ते अनेकांना मारल्याबद्दल बोलतात पण त्यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. ते खोट्या गोष्टींच्या सहाय्यानं राज्य करत आहेत,” असंही ते म्हणाले होते.

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादRahul Gandhiराहुल गांधी