शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जगाची चिंता हा देखावा, केजरीवाल केवळ स्वत:चा विचार करतात; संबित पात्रांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 15:57 IST

मोफतच्या योजना देशाला आर्थिक विनाशाकडे घेऊन जाऊ शकतात, असं न्यायालयानं म्हटलं होतं.

FreeschemesSupremeCourt: निवडणुकीदरम्यान मोफत सुविधा देण्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्यात यावी, अशाप्रकारची याचिका भाजपकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली, यावेळी सर्वोच्च न्यायालयाने देशात सुरू असलेल्या मोफतच्या योजनांवर(फ्री कल्चर) चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, आता यावरून राजकारण तापू लागलं आहे. भाजपते राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.

अरविंद केजरीवाल मोफत गोष्टी वाटतात कारण त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण व्हाव्यात. आपल्याला संपूर्ण जगाची चिंता आहे असं ते दाखवतात, परंतु असं बिलकुल नसल्याचं पात्रा म्हणाले. ”देशात आम आदमी आणि अरविंद केजरीवाल यांची प्रतिष्ठा निर्माण व्हावी हेच त्यांचं टार्गेट आहे. त्यांना आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करायच्या आहेत. यामुळेच ते दिवसेंदिवस खोटं बोलत आहे,” असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी फ्रिबीज आणि वेलेफेअर स्किममध्ये फरक असल्याचं म्हटलं. वेलफेअर एक टार्गेट समुहाला दिलं जातं. ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधारणा होऊ शकतील. फ्रिबीजकडून देशाला कोणालाही दूरवर फायदा होत नसल्याचंही पात्रा यांनी स्पष्ट केलं. “८० लाख कुटुंबांना अन्न पुरवणं हे वेलफेअर आहे. केजरीवाल फक्त मी, माझं आणि माझं कुटुंब यांचाच फायदा पाहतात. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात टार्गेट योजनांमुळे दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या कमी झाली आहे,” असंही ते म्हणाले.आर्थिक विनाशाकडे नेणारसुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटलं की, 'मोफतच्या योजना देशाला आर्थिक विनाशाकडे घेऊन जाऊ शकतात. मोफत योजनांचा कोणालाही दीर्घकालीन फायदा होणार नाही.' केंद्र सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना सॉलिसिटर जनरल म्हणाले की, 'अशाच प्रकारच्या मोफत घोषणा देशाला आर्थिक विनाशाकडे घेऊन जातील. जोपर्यंत सरकार याबाबत कायदा आणत नाही, तोपर्यंत न्यायालयाने हस्तक्षेप करून मार्गदर्शक तत्त्वे ठरवून द्यावीत.'

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राNarendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल