शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

ममता बॅनर्जींना 'जय श्रीराम'चा द्वेष; बंगालमध्ये रामराज्य स्थापन होणार : स्मृती इराणी

By जयदीप दाभोळकर | Updated: January 31, 2021 15:39 IST

तृणमूल सरकार तांदूळ आणि डाळचोर, कोरोनामध्येही महापाप केलं, स्मृती इराणींचा हल्लाबोल

ठळक मुद्देतृणमूल सरकार तांदूळ आणि डाळचोर, स्मृती इराणींचा हल्लाबोलतृणमूल काँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड फेब्रुवारी पर्यंत रिकामी होणार, शुभेंदू अधिकारी यांचा इशारा

येत्या काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशातच भाजप आणि पश्चिम बंगालमधीलममता बॅनर्जी यांचा सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस यांनी आपली कंबर कसली आहे. अशातच दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू आहेत. भाजपचे अनेक नेते पश्चिम बंगालचा दौरा करत आहेत. नुकताच अमित शाह यांचा नियोजित पश्चिम बंगालचा दौरा रद्द झाला. परंतु त्यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पश्चिम बंगालला पोहोचल्या. हावडामध्ये आयोजित एका रॅलीदरम्यान त्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला. इतकंच काय तर त्यांनी बंगाली भाषेत आपलं भाषण केलं. तसंच ममता बॅनर्जी यांना जय श्रीरामचा द्वेष असून या ठिकाणी रामराज्य स्थापन होणार असल्याचंही त्या म्हणाल्या. "यावेळी पश्चिम बंगालमध्ये रामराज्य स्थापित होणार आहे. दीदी यावेळी तृणमूल काँग्रेस सत्तेतून पायउतार होणार आहे आणि भाजप सत्तेत येणार आहे," असं स्मृती इराणी यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांच्या रॅलीदरम्यान बंगालचे भाजप प्रभारी कैलास विजयवर्गीय आणि बंगाल भाजप प्रमुख दिलीप घोष हेदेखील उपस्थित होते. "पहिल्यांदा कोणत्या नेत्यानं कट मनी स्वीकारलं. हे सरकार तांदूळ आणि डाळ चोर आहे. दीदींनी कोरोना महासाथीतही महापाप केलं आहे," असंही त्या म्हणाल्या. "जो पक्ष आपल्या राजकीय स्वार्थासाठई केंद्र सरकारचा द्वेष करतो, जो आपल्याच लोकांना दूर करतो, जो जय श्रीरामच्या घोषणेचा अवमान करतो त्या पक्षाला कोणीही राष्ट्रभक्त ठरवू शकत नाही," असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी शुभेंदू अधिकारी यांनीदेखील तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. "तृणमूल काँग्रेस ही आता लिमिटे़ड कंपनी झाली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत टीएमसी प्रायव्हेट लिमिटेड पूर्णपणे रिकामी होईल. त्यात कोणीच शिल्लक राहणार नाही," असं अधिकारी म्हणाले. अमित शाह यांचाही हल्लाबोलममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची वाटचाल अधोगतीकडे झाली. राज्याचा विकास करण्याचं सोडून ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगाल अन्य राज्यांच्या तुलनेत मागे पडलं, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून अमित शाह यांनी हावडा येथील एका रॅलीला संबोधित करत ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपाSmriti Iraniस्मृती इराणी