शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
2
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
3
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
4
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
5
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
6
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
8
Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय
9
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
10
ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलं! (VIDEO)
11
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
12
"मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार’’, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
13
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
14
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
15
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
16
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
17
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
18
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
19
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
20
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा

राहुल गांधींनी लावली मणिपूरमध्ये आग; राज्यसभेत दिसला स्मृती इरानींचा रुद्रावतार! कोणत्या प्रश्नावर भडकल्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 6:36 PM

काँग्रेस मणिपूर हिंसाचारातील तथ्य लपवत असल्याचे म्हणत, ही आग काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावल्याचा आरोप स्मृती इरानी यांनी केला.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी बुधवारी मणिपूरसंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर जबरदस्त भडकल्या. यावेळी काँग्रेस मणिपूर हिंसाचारातील तथ्य लपवत असल्याचे म्हणत, ही आग काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावल्याचा आरोप स्मृती इरानी यांनी केला. त्यांनी हा आरोप प्रश्नोत्तराच्या तासात केला. अमी याज्ञिक यांनी प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नावेळी महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील महिला सहकारी मणिपूरच्या मुद्द्यावर केव्हा बोलणार? असा प्रश्न केला होता. 

यावर स्मृती इराणी संतापल्या आणि म्हणाल्या माझा यावर तीव्र आक्षेप आहे. केवळ महिला मंत्र्यांनीच नाही, तर महिला राजकीय नेत्यांनीही मणिपूरसह छत्तीसगड, राजस्थान आणि बिहारमधील घटनांवरही लक्ष केंद्रित करायला हवे, असे त्या म्हणाल्या. एवढेच नाही, तर या राज्यांतील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांसंदर्भात बोलण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे (काँग्रेस सदस्य याज्ञिक) आहे का? असा प्रति प्रश्नही त्यांनी यावेळी केला. 

स्मृती म्हणाल्या, ‘‘आपल्यात छत्तीसगडसंदर्भात बोलण्याची हिंमत आणि सामर्थ्य आहे? राजस्थानबद्दल बोलायची हिंमत आहे? बिहारसंदर्भात बोलायची हिंमत आहे? लाल डायरीबद्दल बोलण्याची हिम्मत आहे? एवढेच नाही, तर आपल्यात हे बोलण्याचे धाडक केव्हा येईल की, एक काँग्रेस नेते तेथे गेल्यानंतर, मणिपूर जळायला सुरुवात झाली. राहुल गांधींनी मणिपूरला कसे आगीत ढकलले, हे सांगण्याची हिंमत केव्हा होईस?" अशे सवालही त्यांनी यावेळी केले.याचवेळी, ‘‘काँग्रेसशासित राज्यांतील बलात्काराच्या घटनांवर बोलाण्याची आपली हिंमत आहे? तर आपण या घटनांवर बोलू शकत नसाल, तर केंद्रातील महिला मंत्र्यांवर अनावश्यक दबाव टाकू नका," असा सल्लाही स्मृती इराणी यांनी याज्ञिक यांना दिला.  

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस