शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

“देशात दररोज १४ लोकं आत्महत्या करतायत, ‘मजबूत सरकार’ नाही ‘मजबूत कार्यवाही’ची अपेक्षा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:40 IST

विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि ऋषि अग्रवालसारखे भ्रष्टाचारी आरामात जगत असून, कर्जाचा डोंगर झालेले देशवासी आत्महत्या करतायत.

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून भाजपवर नाराज असलेले नेते असलेले वरुण गांधी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ आणि केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहेत. वरुण गांधी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, यातच आता वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

गुजरातमधील एबीजी शिपयार्ड घोटाळा उघड झाल्यानंतर आता वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाभ्रष्ट व्यवस्थावर एक ‘मजबूत सरकार’ नाही ‘मजबूत कार्यवाही’ची अपेक्षा असल्याचे वरुण गांधी यांनी म्हटले आहे. एक ट्विट करत वरुण गांधींनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

भ्रष्टाचारी लोक ऐशोआरामात जगत

विजय मल्ल्या ९ हजार कोटी, नीरव मोदी १४ हजार कोटी, ऋषि अग्रवाल २३ हजार कोटी अशी आकडेवारी देत, आज देशात दररोज सुमारे १४ जण कर्जाच्या ओझ्याखाली असलेले आत्महत्या करत असताना उपरोक्त धनवान लोकं वैभवाच्या शिखरावर आहे. या महाभ्रष्ट व्यवस्थेवर ‘मजबूत सरकार’ ऐवजी ‘मजबूत कार्यवाही’ करण्याची अपेक्षा आहे, असे वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, उद्योगपती विजय मल्ल्यावर अनेक बँकाकडून घेतलेले ९ हजार कोटी कर्ज न चुकवल्याचा आरोप आहे. तसेच नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकमध्ये १४ हजार कोटींपेक्षा जास्त घोटाळा केल्याचा आरोप आहे. नुकताच एबीजी शिपयार्ड लिमिटेडचे माजी चेअरमन ऋषी अग्रवालचे नाव समोर आले आहे. अग्रवालने २२ हजार ८४२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे.  

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाPoliticsराजकारण