शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
5
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
6
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
7
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
8
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
9
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
10
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
11
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
12
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
13
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
15
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
17
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
18
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
19
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
20
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

भाजपा सत्तेसाठी पैशाचा गैरवापर करत आहे - राहुल गांधी

By admin | Published: March 14, 2017 1:26 PM

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपा सत्तेसाठी पैशाचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - गोवा आणि मणिपूरमध्ये सत्तास्थापनेसाठी भाजपा दावा करत असलेल्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपा सत्तेसाठी पैशाचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. 'गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपाने किती लवकर निर्णय घेतला यापेक्षा किती पैसा ओतला हे महत्वाचं आहे', असं राहुल गांधी बोलले आहेत. 
 
निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी बोललेत की, 'पाचपैकी दोन राज्यांमध्ये भाजपाचा तर तीन राज्यांमध्ये आमचा विजय झाला आहे. आम्ही जिंकलेल्या राज्यांमध्ये पैसा आणि आर्थिक ताकदीचा वापर करत लोकशाहीला हिरावण्याचा प्रयत्न सुरु आहे'. 'आम्ही विरोधी पक्षात आहोत. प्रत्येकाला चढ उतार पाहावे लागतात, आम्ही मान्य करतो की उत्तप्रदेशात थोडा उतार पाहावा लागला', अशी कबुली राहुल गांधींनी दिली आहे.
 
यावेळी राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये रचनात्मक बदल करण्याची गरज असल्याचंही सांगितलं आहे. गोव्यात राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं असल्याने आम्हाला दावा करणं कठीण जाणार असल्याचं राहुल गांधी बोलले आहेत. 
 
'भाजपाच्या विचारसरणीविरोधात आमचा लढा सुरु आहे. जे गोवा आणि मणिपूरमध्ये केलं जात आहे ती त्यांची विचारसरणी आहे, ज्याच्याविरोधात आम्ही लढा देत आहोत', असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.