शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

"सरपंचाने 15 लाखांपर्यंत भ्रष्टाचार केला तर त्यात काही गैर नाही"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 2:29 PM

BJP MP Janardan Mishra : भ्रष्टाचारात काहीच गैर नसल्याचं म्हणत मिश्रा यांनी गावपातळीवर सरपंचाकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमधील भाजपाचे एक खासदार आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. भ्रष्टाचाराबाबत त्यांनी अजब विधान केलं आहे. गावातील सरपंचाने जर 15 लाखांपर्यंत भ्रष्टाचार केला, तर त्यात काहीही गैर नाही. 15 लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला तर त्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो. त्यामुळे सरपंचाने 15 लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला तर तरच आमच्याकडे तक्रार करा, असं विधान खासदाराने केला आहे. त्यांच्या या विधानाचा एका व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतं आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जनार्दन मिश्रा (BJP MP Janardan Mishra) असं या भाजपा नेत्याचं नाव असून ते मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले खासदार आहे. भ्रष्टाचारात काहीच गैर नसल्याचं म्हणत मिश्रा यांनी गावपातळीवर सरपंचाकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला आहे. एखाद्या सरपंचाने 15 लाख रुपयांपर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल, तर मला सांगू नका. लाखो रुपये गुंतवून त्यांनं निवडणूक लढलेली असते. पुढील निवडणुकीसाठीही त्यांना पैशांची गरज आहे. त्यामुळे कोणत्याही सरपंचाने 15 लाखांहून अधिकचा भ्रष्टाचार केला तर तो चुकीचा आहे, असं अजब विधान जनार्दन मिश्रा यांनी केलं आहे.

"15 लाखांपर्यंतचा भ्रष्टाचार केला तर कृपया तक्रार करू नका"

भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी व्हिडीओमध्ये "गावातील सरपंचाने भ्रष्टाचार केला, अशी तक्रार घेऊन नागरिक जेव्हा माझ्याकडे येतात, तेव्हा मी त्यांना म्हणतो की, त्यांनी 15 लाखांपर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल, तर कृपया आमच्याकडे तक्रार करू नका. जर सरपंचाने 15 लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला असेल, तर त्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो. कारण सरपंचाने निवडणुकीत 7 लाख रुपये गुंतवलेले असतात. तसेच पुढील निवडणुकीसाठी त्याला आणखी 7 लाखांची गरज असते. महागाई वाढली तर आणखी 1 लाख जोडा. त्यामुळे ते 15 लाख रुपयांचा घोळ करत असतील, तर त्याला भ्रष्टाचार म्हणता येणार नाही. हीच समाजाची सद्यस्थिती आहे" असं म्हटलं आहे. 

जनार्दन मिश्रा यांनी याआधी देखील अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. काही महिन्यांपूर्वी मिश्रा यांनी शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या कर्जवसूली संदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. शेतकऱ्यांकडे कर्जवसूलीसाठी कोणी आलं तर त्यांचे हात तोडू आणि गळा दाबून मारून टाकू असं जनार्दन मिश्रा यांनी म्हटलं होतं. पक्षाच्यावतीने 'किसान आक्रोश आंदोलना'चं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मिश्रा यांनी असं म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाCorruptionभ्रष्टाचार