शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला; गोडसेच्या विधानावर प्रज्ञासिंह ठाकूरांचा माफीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 13:21 IST

महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात आली.

नवी दिल्लीः महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात आली. त्यानंतर भाजपानंही संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीवरून त्यांना हटवलं. आजही संसदेत गदारोळ झाला असता, प्रज्ञासिंह ठाकूरांनी माफी मागितली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, माझ्या विधानानं जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी माफी मागते, असंही त्या म्हणाल्या आहे. संसदेतील एका सदस्यानं मला दहशतवादी म्हटलं आहे. हा माझ्या प्रतिष्ठेवर हल्ला आहे. न्यायालयात माझ्याविरोधात अजूनही आरोप सिद्ध झालेले नाहीत.माझा कोणताही दोष नसताना मला दहशतवादी ठरवणं कायद्याच्या विरोधात आहे. तरीही मी कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागते. संसदेत प्रज्ञा सिंह ठाकूरांच्या विधानानं काँग्रेसनं मोठा गोंधळ घातला आहे. महात्मा गांधींची जय अशा घोषणाही विरोधकांनी दिल्या आहेत. तर भाजपाच्या खासदारांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी प्रज्ञासिंह ठाकूरांना ट्विटरवरून दहशतवादी म्हटल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.आमची फक्त एकच मागणी आहे, कोणत्याही अटीशिवाय प्रज्ञासिंह ठाकूरांनी माफी मागायला हवी, अशी मागणी काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी केली आहे. दुसरीकडे भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रात काँग्रेसनं शिवसेनेबरोबर जात केलेल्या सत्ता स्थापनेवर टीका केली आहे. काँग्रेसनं शिवसेनेबरोबर सरकार स्थापन केलेलं आहे. शिवसेनेनंही सामनामधून नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं आहे. काँग्रेस सत्तेसाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत लाचार होऊ शकते, असं निशिकांत दुबे म्हणाले आहेत. तत्पूर्वी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हणणाऱ्या भाजप खासदार व मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानाचा धिक्कार करीत भाजपाने त्यांची संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीच्या सदस्यपदावरून गुरुवारी हकालपट्टी केली होती. भाजप संसदीय समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यासही त्यांना बंदी घातली आहे. भाजपाने प्रज्ञा ठाकूर यांचे प्रकरण पक्षाच्या शिस्तभंग समितीकडे पाठवले होते. त्यांना पक्षातून काढून टाकावे, असे भाजपाच्या अनेक नेत्यांचे म्हणणे होते. मात्र, त्या खासदार असल्याने शिस्तभंग समितीच त्याबाबत निर्णय घेईल, असे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा