शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे बांगलादेशातील हिंदू वाचले", भाजप खासदाराचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 14:26 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बांगलादेशातील हिंदूंचे प्राण वाचले, असे विधान खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचारावर मोठा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बांगलादेशातील हिंदूंचे प्राण वाचले, असे विधान खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.

बांगलादेशात जे काही घडले, ती अत्यंत चिंतेची बाब आहे. तिथल्या घटना खूप वेदनादायी आहेत. नरेंद्र मोदींनी बांगलादेशातील हिंदूंना वाचवले आहे. मात्र, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अल्पसंख्यांकांबाबत रात्रंदिवस आटा पिटा करणारे गप्प बसले आहेत, असे खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.

खासदार साक्षी महाराज यांनी अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण इंडिया आघाडीतील नेते अल्पसंख्यांकांबद्दल बोलतात. मात्र, आजपर्यंत त्यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या बाजूने कोणतेही खुले विधान केलेले नाही.

भारतातील जनतेने हे समजून घेतले पाहिजे की त्यांचे समर्थक आणि रक्षक कोण आहेत, असे खासदार साक्षी महाराज म्हणाले. तसेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात की हिंदू कमी झाले तर त्यांना मारहाण केली जाईल. हिंदू कमी झाले तर देशाची फाळणी होईल, त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे, असे खासदार साक्षी महाराज सांगितले.

याचबरोबर, देशातील हिंदूंनी संघटित राहण्याची गरज आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशातील हिंदूंना वाचवले आहे, असे खासदार साक्षी महाराज सांगितले. तसेच, पश्चिम बंगालच्या मुद्द्यावर खासदार साक्षी महाराज म्हणाले की, जर आपण तिथली लढाई लढत असू तर जनतेने लक्ष देण्याची गरज आहे.

बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूवर हल्लेदरम्यान, काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्यावरुन बांगलादेशात असंतोष पसरला होता. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केला होता. यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की, शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. या घटनेनंतर आता बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. मात्र, येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. जमावाकडून देशात अनेक हिंदू समुदायावर हल्ले करण्यात आले. तसेच, गेल्या काही दिवसांत बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूवर हल्ले होत असल्याचे दिसून आले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBangladeshबांगलादेश