शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

'तरुणांनी अजून किती काळ वाट पाहावी?' सरकारी नोकरीच्या मुद्द्यावर वरुण गांधींचे केंद्रावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 12:35 IST

'आधीच सरकारी नोकरी नाही, संधी आली तर पेपर फुटतो. परीक्षा दिली तर वर्षानुवर्षे निकाल लागत नाही, लागला तर एखाद्या घोटाळ्यात तो रद्द होतो.'

नवी दिल्ली: यूपीमध्ये स्पर्धा परीक्षांच्या निकालांना होणारा विलंब, परीक्षेपूर्वी होणारी पेपरफुटी यासारख्या प्रकरणांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. यावरुन आता पीलीभीतचे भाजप खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने केंद्र सरकारला घेरणाऱ्या वरुण गांधींनी यावेळी नोकरी आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे.

वरूण गांधी यांनी ट्विट केले की, 'आधीच सरकारी नोकरी नाही, संधी आली तर पेपर फुटतो. परीक्षा दिली तर वर्षानुवर्षे निकाल लागत नाही, लागला तर एखाद्या घोटाळ्यात तो रद्द होतो. रेल्वे ग्रुप डीचे 1.25 कोटी तरुण दोन वर्षांपासून निकालाची वाट पाहत आहेत. लष्करातील भरतीबाबतही असेच आहे. भारतातील तरुणांनी कधीपर्यंत धीर धरायचा?' असा प्रश्न करत वरुण यांनी सरकारवर टीका केली आहे.

यूपीटीईटी परीक्षेवरुन राज्य सरकारवर निशाणाअलीकडेच उत्तर प्रदेशात यूपीटीईटी परीक्षेचा पेपर फुटला होता. याबाबत वरुण गांधी यांनी ट्विट केले होते की, 'UPTET परीक्षेचा पेपर फुटल्याने लाखो तरुणांच्या भवितव्याशी खेळ होत आहे. या दलदलीतील लहान माशांवर कारवाई करुन चालणार नाही, त्यांचा राजकीय पोशिंदा असलेल्या शिक्षण माफियांवर सरकारने कडक कारवाई करावी.'

'बहुतांश शैक्षणिक संस्था या राजकीय नेत्यांच्या मालकीच्या असल्याने त्यांच्यावर कारवाई कधी होणार? या प्रकरणी लहान लोकांना अटक करण्याऐवजी या लज्जास्पद खेळाचे खरे खेळाडू असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या माफियांवर कारवाई व्हायला हवी', अशी मागणी त्यांनी केली होती.

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशexamपरीक्षा