शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"60 लाख पदे रिक्त, कुठे गेले बजेट?", वरुण गांधींचा पुन्हा आपल्याच सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 12:48 IST

Varun Gandhi : आधीच बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधक केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत, आता भाजप खासदारानेही आपल्याच सरकारला बेरोजगारीचा प्रश्न विचारला आहे.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पिलीभीतचे खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी वरुण गांधी यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून (Unemployment Issue)आपल्या सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. देशात महागाईनंतर बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. यावरून वरुण गांधी यांनी आपल्याच सरकारला गोत्यात आणले आहे. आधीच बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधक केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत, आता भाजप खासदारानेही आपल्याच सरकारला बेरोजगारीचा प्रश्न विचारला आहे.

भाजप खासदार वरुण गांधी यांनी ट्विट करून केंद्रातील लष्कर, पोलीस, आरोग्य इत्यादींसह विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या पदांची संख्या सांगितली आहे. ते म्हणाले, "बेरोजगारी 3 दशकांच्या सर्वोच्च पातळीवर असताना, ही आकडेवारी धक्कादायक आहे. नोकरभरतीअभावी कोट्यवधी तरुण निराश  आहेत. दुसरीकडे सरकारी आकडेवारीच्या म्हणण्यानुसार, देशात 60 लाख 'स्वीकृत पदे' रिक्त आहेत. या पदांसाठी तरतूद करण्यात आलेले बजेट गेले कुठे?, हे जाणून घेणे प्रत्येक तरुणाचा हक्क आहे!"

दरम्यान, भाजप खासदार वरुण गांधी यांनी नेहमीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भले ते त्यांच्याच पक्षाचे सरकार असो. देशातील मंजूर सरकारी पदांवर भरती न करण्याच्या केंद्रातील भाजप सरकारच्या हेतूवर त्यांनी यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशात रिक्त असलेल्या सरकारी पदांबाबत वरुण गांधी यांनी थेट केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

देशातील बेरोजगारी 3 दशकांच्या सर्वोच्च पातळीवर असताना ही आकडेवारी धक्कादायक आहे, असे वरुण गांधी म्हणाले. तसेच, वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटद्वारे देशातील विविध सरकारी विभागांमधील मंजूर रिक्त पदांची आकडेवारी शेअर केली आहे. त्यानुसार देशातील विविध सरकारी विभागांमध्ये 60 लाखांहून अधिक मंजूर पदे रिक्त आहेत. ज्यामध्ये केंद्र सरकारच्या विविध विभाग, आरोग्य सेवा, शिक्षण विभाग, लष्कर, पोलीस, न्यायालयांमध्ये हजारो मंजूर पदे रिक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीBJPभाजपाUnemploymentबेरोजगारी