शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जाणून घ्या, जम्मू काश्मीरमध्ये का लागू होत नाही राष्ट्रपती राजवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 09:11 IST

जम्मू-काश्मीरमध्ये आजपासून राज्यपाल शासन लागू झालं आहे

श्रीनगर: जम्मू-काश्मीर सरकारमधून भाजपा बाहेर पडल्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं आहे. भाजपा सत्तेतून बाहेर पडल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपाल एन. एन. वोहरा यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली आहे. कोणत्याही पक्षानं सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास देशातील अन्य राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होते. मात्र जम्मू-काश्मीर याला अपवाद आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही पक्षानं सरकार स्थापनेचा दावा न केल्यानं राज्यपाल राजवट लागू झाली आहे. आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यपाल शासनाला मंजुरी दिली. जम्मू-काश्मीरमध्ये घटनेच्या कलम 92 अंतर्गत राज्यात 6 महिन्यांसाठी राज्यपाल शासन लागू केलं जातं. मात्र यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक असते. भारताच्या घटनेनं जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा दिला आहे. देशातील अन्य राज्यांमध्ये घटनेच्या कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. मात्र जम्मू-काश्मीरसाठी हे कलम लागू होत नाही. राज्यपाल शासनाच्या अंतर्गत राज्याची विधानसभा निलंबित राहते किंवा भंग केली जाते. जर सहा महिन्यांमध्ये राज्यातील स्थिती सर्वसामान्य झाली नाही, राज्यात निवडणूक झाली नाही, तर मग राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते. सध्या जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. वोहरा आहेत. जून 2018 मध्ये वोहरा यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर 2013 मध्ये त्यांना मुदतवाढ देण्यात आली. मोदी सरकारनं आतापर्यंत काही मोजक्याच राज्यपालांना पुन्हा संधी दिली आहे. त्यातील वोहरा एक आहेत. वोहरा यांची नियुक्ती काँग्रेस सरकारनं केली होती. मात्र त्यांना मोदी सरकारनं कायम ठेवलं आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाBJP-PDPभाजपा-पीडीपीMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीPoliticsराजकारण