शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

भाजप-पीडीपी सरकार अवघड

By admin | Published: March 19, 2016 1:34 AM

भारतीय जनता पक्ष आणि पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी यांच्यातील बोलणी फिसकटल्यामुळे काश्मीरमध्ये सरकार बनण्यातील अडथळे वाढत चालले आहेत. शुक्रवारची

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष आणि पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी यांच्यातील बोलणी फिसकटल्यामुळे काश्मीरमध्ये सरकार बनण्यातील अडथळे वाढत चालले आहेत. शुक्रवारची बोलणी अयशस्वी ठरली, असे पीडीपीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले, तर पीडीपीच्या नव्या मागण्या मान्य करणे शक्य नाही, असे भाजपचे नेते राम माधव यांनी जाहीर केले.मुफ्ती मोहंमद सईद यांच्या निधनानंतर काश्मीरमध्ये या दोन पक्षांचे सरकार बनू शकलेले नाही. पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा सईद सतत नवनव्या अटी घालत असून, त्यामुळे सरकार बनण्यात अडचणी येत असल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत; मात्र मेहबुबा मुफ्ती यांच्या नेमक्या काय अटी आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजप आणि पीडीपी हे दोन्ही पक्ष अटी वा मागण्या याबाबत जाहीरपणे काहीही बोलायला तयार नाहीत. आम्ही कोणत्याही नव्या अटी घातलेल्या नाहीत, मुफ्ती मोहंमद सईद असताना जे ठरले होते, त्या अटीनुसारच सरकार बनवावे, असे आमचे म्हणणे आहे, एवढेच पीडीपीच्या प्रवक्त्याने सांगितले; मात्र पीडीपीच्या नव्या अटी मान्य करणे अशक्य असल्याचे राम माधव यांनी आजच्या चर्चेनंतर स्पष्ट केले. त्यामुळे काश्मीरमध्ये या दोन पक्षांचे सरकार पुन्हा बनणार का, हा प्रश्नच आहे. या दोन पक्षांना एकत्र येऊन सरकार बनवता येत नसेल, तर राज्यात नव्याने विधानसभेच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी यापूर्वीच केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)