शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"गोमूत्र हाय अँटिबायोटिक, ते प्यायल्यास सर्व संसर्गजन्य रोग बरे होतात"; भाजपा खासदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 14:31 IST

BJP Pragya Singh Thakur tell that gomutra is high antibiotic : भाजपा नेत्या आणि भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एक नवा दावा केला आहे. गोमूत्र हे हाय अँटिबायोटिक असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत आढळून येणाऱ्या कोरोना रुग्यांच्या संख्येत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. याच दरम्यान भाजपा नेत्या आणि भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (BJP Pragya Singh Thakur) यांनी एक नवा दावा केला आहे. गोमूत्र हे हाय अँटिबायोटिक असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे. 

भोपाळमध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी अजब विधान केलं असून ते सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. "मी कोरोनापासून वाचले कारण मी दररोज गोमूत्राचं सेवन करते" असं देखील याआधी ठाकूर यांनी म्हटलं आहे. मात्र आता "आम्ही गोमूत्र पवित्र मानतो. तर अनेक संशोधक असंही म्हणतात की गोमूत्र हाय अँटिबायोटिक आहे. संशोधनातील दाव्यांनंतर आम्हाला आढळलं की गोमूत्र प्यायल्यास सर्व संसर्गजन्य रोग बरे होतात" असा दावाच प्रज्ञा सिंह ठाकूर केला आहे. ठाकूर यांच्या या नव्या विधानावरून अनेकांनी जोरदार निशाणा साधला आहे. 

"मी कोरोनापासून वाचले कारण मी दररोज गोमूत्राचं सेवन करते" 

ठाकूर यांनी गोमूत्राचे फायदे सांगण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. देशातील कोरोना दुसऱ्या लाटेच्या कालावधीदरम्यान त्यांनी असच एक अजब विधान केलं होतं. मी कोरोनापासून वाचले. कारण मी दररोज गोमूत्राचं सेवन करते असं म्हटलं होतं. एका कार्यक्रमादरम्यान ठाकूर यांनी "गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचा संसर्ग बरा होतो. मी स्वतः दररोज गोमूत्राचा अर्क घेते. म्हणूनच मला करोनाचा संसर्ग झाला नाही" असं सांगितलं होतं. तसेच कोरोना बरा होण्यासाठी हनुमान चालीसा म्हणण्याचा उपाय सुचविला होता. हनुमान चालीसा म्हणा, कोरोना बरा होईल असा देखील सल्ला दिला होता. 

"या आपण सर्वांनी मिळून कोरोना महामारी संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक आध्यात्मिक प्रयत्न करूया. 25 जुलैपासून ते 5 ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता आपापल्या घरात हनुमान चालिसेचे पठण करावे. 5 ऑगस्टला रामलल्लाची आरती झाल्यानंतर आपापल्या घरात दिवा लावून याचा समारोप करावा" असं ट्विट प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,29,45,907 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 42,618 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 330 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,40,225 लोकांना जीव गमवावा लागला आहे. 

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरbhopal-pcभोपाळBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत