शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

No Confidence Motion : 'बन्द करो ये झूठ का फाटक...'; राहुल गांधींच्या 'झप्पी'ला भाजपाचं कवितेतून प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 15:50 IST

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात  गेल्या शुक्रवारी लोकसभेत मांडल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट हीच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. मात्र या गळाभेटीवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून

नवी दिल्ली  - नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात  गेल्या शुक्रवारी लोकसभेत मांडल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट हीच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. मात्र या गळाभेटीवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, राहुल गांधींच्या या गळाभेटीला भाजपाने  कवितेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केले. मात्र भाषण संपल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदींची घेतलेला गळाभेट आणि नंतर आपल्या शेजारी बसलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना मारलेला डोळा यामुळे भाजपा नेत्यांना त्यांच्याविरोधात आयतेच कोलीत मिळाले. तेव्हापासून भाजपाच्या मंत्र्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांनी राहुल गांधींना टीकेचे लक्ष्य करणे सुरू ठेवले आहे. दरम्यान, सोमवारी भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक कविता शेअर केली आहे. "70 साल प्यार का नाटक, बंद करो झूट का फाटक या आशयाच्या या कवितेमधून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.  

भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनीही राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना 1984 ची दंगल आणि भागलपूर दंग्यांची आठवण करून दिली. देशात असा कुठलाही मुद्दा नाही ज्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत, असे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. 

  केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनीही राहुल गांधींना टीकेचे लक्ष्य केले आहे. राहुलजी कुठलीही दुर्घटना घडल्यावर त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणे बंद करा. सरकारने या प्रकरणी कठोर कारवाई केली आहे. तुम्ही राजकीय लाभासाठी समाजात फूट पाडत आहात, अशा शब्दार पियूष गोयल यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.  

शुक्रवारी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घेतलेल्या गळाभेटीवरून लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी राहुल गांधींना खडेबोल सुनावले होते. मात्र काँग्रेसने याचा राजकीय लाभ घेण्यास सुरुवात करताना मुंबईत पोस्टरबाजी केली होती. तसेच द्वेषाने नाही तर प्रेमाने जिंकणार, असा संदेशही दिला होता.  

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसSmriti Iraniस्मृती इराणीpiyush goyalपीयुष गोयल