शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Bangladesh: “बांगलादेशमधील हिंदूंवरील हल्ले थांबले नाहीत, तर भारताने थेट आक्रमण करावे”; BJP नेता आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 14:20 IST

Bangladesh: भारतातील हिंदू संघटनांनी याचा तीव्र विरोध करत केंद्र सरकारला यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देबांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्याचा जगभरातून निषेध न्यूयॉर्कमधल्या हिंदू संघटनांची अमेरिकेतील बांगलादेश दूतावासासमोर निदर्शनेलेखिका तस्लिमा नसरीन यांची देखील तीव्र शब्दात टीका

नवी दिल्ली:बांगलादेशात हिंदूंच्या ६६ घरांची नासधूस करण्यात आल्यानंतर जवळपास २० घरे जाळण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात दुर्गा पूजेदरम्यान मंदिर तोडफोडीच्या घटनांनंतर कथित निंदनीय मीडिया पोस्टवरून बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला. यानंतर भारतातील हिंदू संघटनांनी याचा तीव्र विरोध करत केंद्र सरकारला यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. यातच आता एका भाजप नेत्याने बांगलादेशवर आक्रमण करावे, असे म्हटले आहे. 

बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. न्यूयॉर्कमधल्या हिंदू संघटनांनी अमेरिकेतील बांगलादेश दूतावासासमोर निदर्शने केली. तसेच अजूनही अनेक देशांतील बांगलादेश दूतावासासमोर हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी देखील तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. तसेच भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनीही आक्रमक पवित्रा घेत अन्यथा भारताने आक्रमण करावे, असे म्हटले आहे. 

...तर भारताने थेट आक्रमण करावे

बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हल्ले थांबले नाहीत, तर भारताने आक्रमण करावे, अशी मागणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे केली आहे. दोन-तीन दिवसांपासून बांग्लादेशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हिंदू वस्त्यांना टार्गेट केले जात आहे. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महासचिव मिलिंद परांदे म्हणाले की, रात्रीच्या अंधारात चटगाव येथील कोमिला क्षेत्रात मुद्दामहून षडयंत्र रचले गेले आणि कुराणाचा अपमान झाल्याची अफवा पसरवली गेली. यानंतर हल्लेखोरांनी दुर्गा पूजा मंडळावर हल्ला करत देवी-देवतांच्या मूर्तींची नासधूस केली. तोडफोड केली. यामुळे हिंदू समाज अतिशय दुःखी झाला आहे. हिंदूवरील अत्याचार आणि शोषण कायम असून, यातील घटनांमध्ये वाढ होत आहे, असे परांदे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मंदिरांवर झालेल्या हल्ल्यात दोन हिंदुंचा मृत्यू झाला असून, या घटनेत सुमारे ५०० जण जखमी झाले. यानंतर बांगलादेशच्या चटगांव विभागातील कुमिला येथील दुर्गा पूजेच्या ठिकाणी निंदा केल्याच्या कथित घटनेनंतर जातीय तणाव वाढला. ज्यामुळे हिंदू मंदिरे आणि कमिल्ला, चांदपूर, चॅटोग्राम, कॉक्स बाजार, बंदरबन, येथील मंदिरांवर हल्ले झाले.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशBJPभाजपाSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी