शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

भाजपा तीनच जागा लढवणार; महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 15:01 IST

भाजपाने तीनच जागांवर राज्यसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याने आता सहाही जागांवरील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली - राज्यातील राज्यसभा निवडणुकांसाठीच्या उमेदवारीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. राज्यसभेच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत उद्या १५ फेब्रुवारी असून महाराष्ट्रातील ६ जागांसाठीचे उमेदवार जाहीर करण्यात येत आहेत. काँग्रेसने चंद्रकांत हांडोरे यांची उमेदवारी राज्यसभेसाठी जाहीर केल्यानंतर आता महायुतीनेही ४ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, अजित पवार यांच्याकडील उमेदवाराची घोषणा अद्याप झाली असून लवकरच तीही घोषणा होईल. मात्र, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठीही ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

भाजपाने तीनच जागांवर राज्यसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याने आता सहाही जागांवरील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाकडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून नुकतेच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांच्यास भाजपा नेत्या आणि आमदारकीवेळी आपली जागा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोडणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनाही भाजपाने संधी दिली आहे. तर, भाजपाकडून डॉ. अजित गोपछडे यांनाही संधी मिळाली आहे. भाजपाने आपल्या तीन उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केल्यामुळे आता भाजपाकडून तीनच जागा लढवण्यात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपा चार जागांवर उमेदवार देईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. 

महायुतीच्या ४ उमेदवारांची घोषणा झाली असून भाजपने ३ तर शिवसेना शिंदे गटानेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेकडून माजी खासदार व काँग्रेसमधून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या मिलिंद देवरा यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, महायुतीचे ४ जागांवरील उमेदवार निश्चित झाले असून अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून बाबा सिद्दिकी यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

काँग्रेसनेही आपल्या उमेदवाराची घोषणा केली असून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील सहा जागांपैकी ५ जागांवरील उमेदवार घोषित झाले आहे. त्यामुळे, भाजपाकडून तीन, शिवसेना १, राष्ट्रवादी १ आणि काँग्रेस १ अशा एकूण ६ जांगावर ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकAshok Chavanअशोक चव्हाण