शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
3
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
4
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
5
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
6
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
7
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
8
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
9
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
11
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
12
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
13
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
14
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
15
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
16
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
17
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
18
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
19
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
20
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात

भाजपची सत्ता जाणार, देशात अच्छे दिन फटाफट फटाफट येणार: राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 12:46 PM

उन्हाच्या वाढत्या झळांचा त्रास झाल्याने डोक्यावर ओतले पाणी

बांसगाव: ४ जूननंतर केंद्रातील भाजपची सत्ता जाणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनता बाय बाय करणार आहे. इंडिया आघाडीला मते खटाखट खटाखट मिळत आहेत. त्यामुळे भाजपपासून देशाची सुटका होणार असून देशात अच्छे दिन फटाफट फटाफट येणार असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.

इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात आले तर आरक्षणावर असलेली ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही रद्दबातल करणार, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. इंडिया आघाडी जीवाची बाजी लावून राज्यघटनेचे रक्षण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमधील बांसगाव येथे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या समवेत मंगळवारी घेतलेल्या प्रचारसभेत त्यांनी सांगितले की, देशाची राज्यघटना व इंडिया आघाडी एका बाजूला आहेत, तर दुसऱ्या बाजूला राज्यघटना संपविण्यासाठी सज्ज असलेले लोक आहेत. इंडिया आघाडी देशाच्या राज्यघटनेला अजिबात धक्का लागू देणार नाही.

...डोक्यावर ओतले पाणी

बांसगाव येथे प्रचारादरम्यान राहुल गांधी यांना उन्हाच्या वाढत्या झळांचा त्रास झाला. यावेळी त्यांनी भाषण देत असतानाच पाणी पिले. त्यानंतर खूपच उकाडा असल्याचे म्हणत पाण्याची पूर्ण बॉटल आपल्या डोक्यावर ओतली.

उद्योगपतींना मदत

राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांना देवाने गरिबांना नव्हे तर उद्योगपतींना मदत करण्याकरिता पाठविले आहे. ‘इंडिया’  सत्तेवर आल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था खूप वेगाने प्रगती करेल.

‘मोदी यांच्या राजवटीत कायद्याचे राज्य संपुष्टात’

  • मोदींच्या राजवटीत कायद्याचे राज्य संपुष्टात आले आहे, अशी टीका राहुल यांनी केली.
  • कोणत्याही अत्याचाराविरोधात समाजातील तळागाळातला माणूस आवाज उठवू शकेल, अशी यंत्रणा आम्ही निर्माण करू.
  • बाबासाहेबांचे संविधान हटवून वंचितांचे हक्क व आरक्षण हिरावून घेणे हे नरेंद्र मोदी आणि भाजपचे अंतिम ध्येय आहे, असे ते म्हणाले.
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा