शहरं
Join us  
Trending Stories
1
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
2
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा
3
भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू
4
अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची वेळ ठरली? महत्त्वाची अपडेट
5
Arjun Tendulkar Video: Video: अर्जुन तेंडुलकरचा धमाका! ९ विकेट्स घेत फिरवला 'गेम'; संघाला मिळवून दिला विजय
6
एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेते 'ही' ग्लॅमरस गर्ल; नेटवर्थ समजताच व्हाल हैराण
7
महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, ८० नाही, ९० नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला
8
महाराष्ट्रासोबत दिल्लीतही मुदतपूर्व निवडणूक लागणार? आपची पहिली प्रतिक्रिया, काय आहेत नियम...
9
बँकांप्रमाणे LIC मध्येही होणार डिजिटल क्रांती; मोठ्या बदलासाठी Infosys कडे दिली जबाबदारी
10
PM मोदी गोंजारतायत ती अडीच फुटांची गाय कुठे मिळते? एक वेळ तर केवळ 100 च उरल्या होत्या; जाणून घ्या किंमत
11
"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
12
'या' देशांमध्ये मिळतंय कवडीमोल भावात पेट्रोल; किंमत जाणून बसेल धक्का
13
राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...
14
टीम इंडियाला श्रीलंकेत रडवणाऱ्या Dunith Wellalage ला ICC कडून मिळाला खास सन्मान
15
पालकांसाठी अलर्ट! मुलांच्या हातात फोन देण्याचं योग्य वय काय, नेमका किती असावा स्क्रीन टायमिंग?
16
Amit Shah : "दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू", अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
17
सई ताम्हणकरचा नॉन ग्लॅमरस लूक चर्चेत, लवकरच दिसणार वेगळ्या अंदाजात
18
Maharashtra Vidhan Sabha : बाळासाहेब थोरातांना सुजय विखे संगमनेरमधून देणार आव्हान!
19
SEBI चा यू-टर्न; 'कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण चर्चेनंच होणार..,' 'ते' वक्तव्यही घेतलं मागे
20
मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण

'या' राज्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत न लढताच भाजपानं ७० टक्के जागा जिंकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 8:36 AM

भाजपानं १८८ जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तर सीपीआय १४८ आणि काँग्रेसनं ९८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

नवी दिल्ली - त्रिपुरामध्ये सत्ताधारी भाजपानं राज्यातील त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थेत जवळपास ७० टक्के जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. पंचायत प्रणालीत एकूण ६८८९ जागा आहेत. ज्यात ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा समावेश आहे. या जागांपैकी भाजपानं ४८०५ जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. ग्रामपंचायतीत भाजपानं ६३७० पैकी ४५५० जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे त्यामुळे ७१ टक्के जागांवर कुठलंही मतदान होणार नाही.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव असित कुमार दास यांनी म्हटलं की, ज्या १८१९ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. त्यात भाजपानं १८०९, सीपीआय(एम) १२२२ आणि काँग्रेसनं ७१३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील महेशखला पंचायतीच्या एका जागेवर निवडणूक होणार नाही जिथं भाजपाच्या उमेदवाराचं निधन झालं आहे. पंचायत समितीत भाजपानं एकूण ४२३ जागांपैकी २३५ म्हणजे ५५ टक्के बिनविरोध जिंकल्या आहेत. आता १८८ जागांसाठी मतदान होणार आहे.

तसेच भाजपानं १८८ जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तर सीपीआय १४८ आणि काँग्रेसनं ९८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजपानं ११६ जिल्हा परिषदेच्या जागांमध्ये २० जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. भाजपानं सर्व ९६ जिल्हा परिषद जागांवर उमेदवार उतरवले आहे तर सीपीआयनं ८१ आणि काँग्रेसनं ७६ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. उमेदवारी अर्ज परत घेण्याची अखेरची तारीख २२ जुलै होती. याठिकाणी ८ ऑगस्टला मतदान पार पडणार आहे. तर मतमोजणी १२ ऑगस्टला होईल. मागील निवडणुकीत भाजपानं त्रिस्तरीय पंचायत प्रणालीतत ९६ टक्के जागांवर बिनविरोध विजय मिळवला होता. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस