शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

मित्रांनी साथ सोडल्याने भाजपची चिंता वाढली; शिवसेना वगळता मोठा पक्ष मदतीला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 05:35 IST

यामुळे भाजप नेतृत्व विविध राज्यांमध्ये आणखी मित्रपक्ष जोडण्यास उत्सुक आहे.

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने २९ मित्रपक्षांसह ३५२ जागा जिंकल्या होत्या. आता लोकसभा निवडणुका केवळ ११ महिन्यांवर आलेल्या असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना वगळता एनडीएमध्ये कोणताही मोठा प्रादेशिक पक्ष उरलेला नाही. यामुळे भाजप नेतृत्व विविध राज्यांमध्ये आणखी मित्रपक्ष जोडण्यास उत्सुक आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये लहान पक्षांना बरोबर घेण्याचे आणि जनता दल (यू)मध्ये फूट पाडण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बिहारमध्ये जद(यू), काँग्रेस आणि राजदच्या नेत्यांनाही भाजप आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करीत आहे. जद(यू) आणि एलजेपीच्या सहकार्याने भाजपने २०१९ मध्ये बिहारमध्ये ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या.

आंध्र प्रदेशात टीडीपी आणि जन सेना पार्टीचे पवन कल्याण यांच्यासोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असून, तेथे काही जागा जिंकण्याची आशा आहे. कर्नाटकमधील अपमानास्पद पराभवानंतर राज्यात जद(एस)चे नेते एच. डी. देवेगौडा यांच्याशी लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करण्याची तयारी सुरू आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल (बादल)बाबत स्थिती अद्याप स्पष्ट व्हायची आहे. भाजपच्या या जुन्या मित्रपक्षाने शेतकरी कायद्यांच्या मुद्द्यांवरून २०२०मध्ये साथ सोडली होती.

२५वा वर्धापन दिन आला आणि गेला

भाजपने १५ मे रोजी एनडीएचा २५वा वर्धापन दिन साजरा केला असता. परंतु तो दिवस आला तसा गाजावाजा न करता गेला; कारण एनडीएमध्ये कोणतेही मोठे पक्ष उरले नाहीत. हरयाणातही भाजपपुढे अडचण निर्माण झाली आहे. तेथे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी आपला पक्ष जेजेपीसाठी लोकसभेच्या चार जागा मागितल्या आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा