शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

भाजपाच्या अश्वमेधाला यूपीत अनेक अडथळे

By admin | Published: February 19, 2017 2:06 AM

बिहारच्या पराभवानंतर भाजपाने उत्तर प्रदेशची सत्ता मिळवण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न चालवले आहेत. आधी ब्राह्मण समाजाला मायावतींपासून तोडले. बसपाच्या

- सुरेश भटेवरा, बाराबंकी

बिहारच्या पराभवानंतर भाजपाने उत्तर प्रदेशची सत्ता मिळवण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न चालवले आहेत. आधी ब्राह्मण समाजाला मायावतींपासून तोडले. बसपाच्या अनेक नेत्यांना भाजपात आणले. सपात परिवारात फूट पाडण्याचे प्रयत्न केले. प्रदेशाध्यक्षपदी केशवप्रसाद मौर्यांची नियुक्ती करून ओबीसींना जवळ केले. मुझफ्फरपूर दंगलीच्या जखमा उघड्या करून, जाटव समाजाला बांधून ठेवण्याचा डाव केला.दलित जातींना आमिषे दाखवली. केंद्रात उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांची संख्या वाढवताना अपना दलाच्या अनुप्रिया पटेलांना मंत्रिपद दिले. सर्जिकल स्ट्राइकचाही प्रचार केला. त्यामुळे येथील सत्ता भाजपाला मिळेल, असे वातावरण अगदी सहा महिन्यापूर्वीपर्यंत होते. परंतु, आता चित्र पालटताना दिसत आहे. निवडणूक जाहीर होण्याआधी अगोदर पंतप्रधान मोदींनी, पक्षाचे नेते खासदार, आमदारांच्या नातेवाईकांना तिकिटे देणार नाही, अशी घोषणा केली. प्रत्यक्षात अमित शाह यांनी केलेल्या तिकीटवाटपात बड्या नेत्यांचे ८0 कुटुंबीय व नातेवाईकच आहेत. जुन्या निष्ठावानांऐवजी कालपरवा आयात केलेल्या अनेकांना तिकिटे वाटली. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी आहे. काहींनी बंड पुकारले. नोटाबंदीनंतर तर इथे भाजपाच्या भवितव्याला ग्रहणच लागले. लघु उद्योग आणि छोट्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले. अनेक मजुरांवर बेरोजगारीची पाळी आली. हक्काचा मतदारही नाराज झाला. याचा परिणाम आता निवडणुकीच्या समरांगणात जाणवतो आहे.