शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

आसाम अशांत करण्याचं भाजपाचं षडयंत्र - मुख्यमंत्री तरूण गोगोई

By admin | Published: December 09, 2015 4:40 PM

आसाममध्ये कायदा व सुव्यवस्थेची समस्य निर्माण करण्याचं आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षडयंत्र भाजपा रचत असल्याचा आरोप मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी केला आहे

ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. ९ - आसाममध्ये कायदा व सुव्यवस्थेची समस्य निर्माण करण्याचं आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षडयंत्र भाजपा रचत असल्याचा आरोप मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी केला आहे. मोदी सरकारने दिलेली वचने पूर्ण करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी आजच्या दिसपूर घेरावचे आयोजन करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 
पत्रकारांशी बोलताना गोगोई म्हणाले की, राज्यामध्ये धार्मिक तणाव निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न असून मंदीरामध्ये बीफ ठेवण्याचं कारस्थान रचण्यात आलं होतं अशी गुप्तचरांची माहिती आहे. कट्टरतावाद्यांना, ज्यामध्ये बंडखोर आणि जिहादी यांचा समावेश आहे, अशांना भाजपा प्रोत्साहन देत असल्याचा आरोप गोगोईंनी केला आहे. 
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, हिंदू सेना आणि अन्य संघटना कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण करण्यामध्ये गुंतली असल्याचे गोगोई म्हणाले. काँग्रेस येत्या महिन्यांमध्ये चांगलं काम करेल आणि भाजपाला सत्तेत येता येणार नाही या भीतीपोटी त्यांना राष्ट्रपती राजवट आणायची आहे, आणि त्यासाठीच हे षडयंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप गोगोईंनी केला आहे. 
भाजपाच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी काँग्रेस सरकार भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करत निदर्शने केली. त्यासंदर्भात गोगोईंनी आपली भूमिका पत्रकारांसमोर मांडली.