शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

दिल्ली, पंजाब, चंदिगढमधील उमेदवारांच्या निश्चितीवरून भाजपची द्विधा मन:स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:53 IST

दिल्लीतील सातपैकी काही खासदारांना संधी नाही; गौतम गंभीरच्या नावाचा विचार सुरू

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : दिल्ली, पंजाब, चंदिगढ आणि हरियाणातील दोन जागांबद्दल काय निर्णय घ्यावा या द्विधा मन:स्थितीत भाजपचे नेतृत्व सापडले आहे. पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी ४०६ उमेदवारांची नावे आतापर्यंत जाहीर केली असून ३१ जागांवरील नावे मागेच ठेवली आहेत. त्यात दिल्लीतील सर्व सात, पंजाबमधील १३ पैकी तीन आणि चंदिगढमधील एकमेव व हरियाणातील दोन जागांचा समावेश आहे.

काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पक्षाच्या काही धोरणांवरून उदित राज हे काळजीचा सूर आळवत आहेत. राज यांना मोठा गाजावाजा करून आणले गेले. परंतु, मतदारसंघातील त्यांची कामगिरी काळजीचा विषय ठरली आहे. तिसरा बळी हा महेश गिरी यांचा असू शकेल. गिरी यांच्या मतदारसंघात केंद्रीय कॅबिनेट मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना कदाचित पाठवले जाईल आणि काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची (आप) आघाडी झाली तर काँग्रेसचे कपिल सिबल हे विरोधकांचे एकत्रित उमेदवार असू शकतील त्या चांदणी चौक मतदारसंघात नवा चेहरा दिला जाऊ शकतो. मोदी यांची लाट असल्याचा दावा आणि विद्यमान खासदारांबद्दलची नाराजी असल्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची इच्छा असलेले भाजपचे नेतृत्व कमालीचे काळजीत पडले आहे. काँग्रेस-आपची आघाडी झाल्यास ती भाजपला तोंड देण्यास सक्षम आहे. कारण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे समाजातील गरीब वर्गात चांगले वजन आहे.

दिल्लीतील तीन जागांच्या बदल्यात हरियाणा, पंजाब आणि गोव्यातील जागा काँग्रेसकडून मान्य करून घेण्यातील केजरीवाल यांच्या कौशल्यामुळे भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर होण्यात विलंब होत आहे. भाजपमधील अनेकांना पक्षाचा हा दुबळेपणा असल्याचे व त्यामुळे चुकीचे संकेत जात असल्याचे वाटते. येत्या ४८ तासांत भाजप हरियाणा, पंजाब व दिल्लीतील उर्वरित जागांसाठीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. रोहटकमध्ये उमेदवार जाट द्यावा की नाही याचा निर्णय भाजपच्या नेतृत्वाचा अजून होत नाही, असे समजते. हुड्डा यांच्याविरुद्ध जाटेतर समाज असल्यामुळे येथून जाट उमेदवार नको, असे मनोहरलाल खट्टर यांना वाटते. २०१४ मध्ये मोदी यांची भरभक्कम लाट असतानाही भाजपला हरियाणात रोहटकसह तीन जागा जिंकण्यात अपयश आले होते.तीन खासदारांना घरचा रस्ता दाखवणार?दिल्लीतील विद्यमान सातपैकी काही खासदारांबद्दल तीव्र नाराजी असल्यामुळे नेतृत्वाला मोठी शस्त्रक्रिया करायची इच्छा आहे. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभेच्या विद्यमान तीन खासदारांपैकी किमान तिघांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल व त्यात नवी दिल्लीतील मीनाक्षी लेखी, उदित राज (वायव्य) आणि महेश गिरी (पूर्व) यांचा समावेश आहे.