शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजपाचे उद्योगपती जावई मुंबई गिळायला निघालेत, संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 12:14 IST

मुंबईची लूट सुरूच आहे. धारावीच्या जावयाला आम्ही मुंबई गिळू देणार नाही. या मोर्चात मुंबईकर उपस्थित असतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

नवी दिल्ली : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अदानी समूहाविरोधात आक्रमक आहेत. उद्धव ठाकरे उद्या (दि.१६) अदानी समूहाविरोधात मोर्चा काढणार आहेत. धारावीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. गौतम अदानी हे भाजपाचे उद्योगपती जावई आहेत. भाजपाच्या जावयाला मुंबई गिळायची आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.  शुक्रवारी त्यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.

धारावीसंदर्भात मोर्चा निघणारच आहे. आंदोलन होणार आहे. धारवी बचाव हा मोर्चा फक्त धारावी साठी नाही तर संपूर्ण मुंबईसाठी आहे. धारावीच्या माध्यमातून भाजपाचे उद्योगपती जावई (गौतम अदानी) मुंबई गिळायला निघाले आहेत. मुंबईची लूट सुरूच आहे. धारावीच्या जावयाला आम्ही मुंबई गिळून देणार नाही. या मोर्चात मुंबईकर उपस्थित असतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

यादरम्यान संजय राऊत यांनी इंडिया आघाडी आणि आगामी लोकसभेच्या जागा वाटपावर सुद्धा भाष्य केले. महाराष्ट्रात आमचे जागावाटप झाले आहे. राज्यात आमचे उत्तम समन्वय आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही बोलणे शेवटच्या टप्प्यात आहे. आम्ही राज्यात ४० प्लस जागा जिंकू. प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग देशासाठी महत्वाचा आहे, असे संजय राऊत म्हणाले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावरून सुद्धा संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्याचे दोन उपमुख्यमंत्री कशाकरता दिल्लीत येत आहेत, माहित नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत. बहुतेक संसदेची सुरक्षा पाहायला येत असतील. बेरोजगारी महागाईचा मुद्दा आहे. कांदा इथेनॉल प्रकरणी राज्यातील लोक आक्रमक आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

सरकार अस्थिर आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. कोर्टात तारखा पडून घेतल्या जात आहेत. कोर्टाकडून तारखा वाढवत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर डमरू वाजवत बसले आहेत. एक फुल दोन हाफ हे सरकार... इथं येऊन काय करणार ते? त्यांना दिल्ली मुंबईचा पास काढलेला दिसतोय. त्यांच्या दौऱ्याचा राज्याला काय उपयोग? सगळा खेळ खंडोबा सुरू आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले.

ठाकरे गटाचा धारावी ते अदानी कार्यालय मोर्चामुंबईत १६ डिसेंबरला ठाकरे गट धारावी ते अदानी कार्यालय असा भव्य मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला मुंबईकरांनी हजर राहावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्प, वीजबिलात झालेली दरवाढ यांवर जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच, धारावी पुनर्विकासातून झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काची पक्की घरे मिळणार आहेत. पण, या पुनर्विकास प्रकल्पाच्या योजनेत शेकडो कोटींचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.

दरम्यान, मोर्चासाठी ठाकरे गटाने धारावी पोलिसांना पत्र दिले होते. या पत्रातून ठाकरे गटाने मोर्चाला परवानगी देण्याची मागणी केली होती. पण धारवी पोलिसांनी ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. धारावी पोलिसांनी ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी दिलेली नाही. मोर्चाच्या परवानगीसाठी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवा, अशी सूचना धारावी पोलिसांनी ठाकरे गटाला केली आहे. यानंतर ठाकरे गटाने मुंबई पोलिस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिस आयुक्त ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाGautam Adaniगौतम अदानीMumbaiमुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरे