शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

दादरी हत्या ही भाजपाची पूर्वनियोजित खेळी - अखिलेश यादव

By admin | Published: October 13, 2015 4:20 PM

दादरीमध्ये बीफ बाळगल्याच्या अफवेवरून एका मुस्लीमाची झालेली हत्या ही भाजपाची पूर्वनियोजित खेळी असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - दादरीमध्ये बीफ बाळगल्याच्या अफवेवरून एका मुस्लीमाची झालेली हत्या ही भाजपाची पूर्वनियोजित खेळी असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे. मोहम्मद अखलाख यांची बिसारा गावामध्ये जमावाने हत्या केल्यानंतर त्याचे पडसाद देशभर उमटले. या घटनेवर एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अखिलेश यांनी हा हल्ला उत्स्फूर्त होता यावर आपला विश्वास नसल्याचे सांगितले.
सरकारने केलेल्या तपासात आढळलेल्या तथ्यांनुसार भाजपा आणि भाजपाशी संबंधित व्यक्तिंनी अत्यंत पूर्वनियोजित पद्धतीने हा प्रकार घडवून आणल्याचे जाणवत असल्याचे अखिलेश म्हणाले.
भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांना उत्तर प्रदेशातले भाजपाचे नेते काय करत आहेत, याची व्यवस्थित कल्पना असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपा उत्तर प्रदेशात धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. लोकांचं लक्ष राजकीय मुद्यांवरून हटवण्यासाठी आणि समाजामध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी भाजपा युपीमध्ये सारखे वेगळे मुद्दे उचलत असल्याचे सांगताना अखिलेश यांनी आधी लव्ह जिहाद मग धरवापसी नंतर मुरादाबादमध्ये ध्वनीवर्धक यंत्रणेविरुद्ध आक्षेप आदी उदाहरणे दिली. 
अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीची मुस्लीमांची मते मिळावी यासाठी भाजपाच्या ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांना फूस असल्याचा आरोप अखिलेश यांनी फेटाळला आहे. मुझफ्फरनगरच्या दंगलीचा लाभ कुणाला झाला असा प्रतिप्रश्न करताना नंतरच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये युपीमध्ये भाजपाला ७३ जागा मिळाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. समाजवादी पार्टीला आधीच्या निवडणुकीत ३९ जागा मिळाल्या होत्या, ज्यांची संख्या ५ वर आली. उत्तर प्रदेशात तणाव निर्माण करण्याची भाजपाची योजना असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुंतवणुकीसाठी जगभरात फिरत असल्याचे सांगताना अखिलेश म्हणाले की अशा घटनांमुळे मोदींच्या प्रयत्नांना खिळ बसेल. भाजपाचे काही नेते वाट्टेल ते बोलत आहेत, त्यांच्यावर कुणाचा अंकुश आहे ते भाजपाने स्पष्ट करावे अशी मागणीही त्यांनी केली. 
बिहारच्या निवडणुकांमागोमाग काही महिन्यातच, २०१७च्या सुरुवातीला उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत आणि २०१२मध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अखिसेलश यादव यांचा कस लागणार आहे. राज्यातली कायदा व सुव्यवस्था आणि वाढता धार्मिक तणाव यामुळे त्यांच्यावर सध्या सर्व स्तरातून टीका होत आहे.