शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

राष्ट्रवादाच्या चर्चेत भाजपाची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2016 11:48 PM

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राष्ट्रवादावरील वैचारिक संघर्ष पुढेही सुरू ठेवण्याचा मानस जाहीर करताना या मुद्यावर भारतीय जनता पार्टीने (भाजप) पहिल्या टप्प्यात विजय संपादन

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राष्ट्रवादावरील वैचारिक संघर्ष पुढेही सुरू ठेवण्याचा मानस जाहीर करताना या मुद्यावर भारतीय जनता पार्टीने (भाजप) पहिल्या टप्प्यात विजय संपादन केला असल्याचा दावा शनिवारी केला. आतापर्यंत जे लोक भारताविरुद्ध नारेबाजी करीत होते ते ‘भारत माता की जय’ म्हणत नसले तरी ‘जय हिंद’ ही घोषणा देण्यास बाध्य झाले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.हा मुद्दा अधिक तापविताना जेटली यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही लक्ष्य साधले. ते म्हणाले, काही लोक लाखो करोडो देशवासीयांचे प्रेरणास्थान ठरलेल्या सावरकरांच्या राष्ट्रवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. एवढेच नाहीतर देश तोडण्याची भाषा करणाऱ्यांच्या कार्यक्रमांमध्येही सहभागी होत आहेत. राहुल गांधी यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वादानंतर तेथील दौरा केला होता. हे आमच्यापुढील फार मोठे वैचारिक आव्हान आहे. आम्ही हा एक सैद्धांतिक संघर्ष मानला पाहिजे, असे मत मांडताना जेटली यांनी सांगितले की, देशाविरुद्ध नारेबाजी करणारे लोक आता किमान जय हिंद म्हणण्यास तयार झाले आहेत आणि हा आमचा पहिला विजय आहे. भाजपाची विचारसरणी राष्ट्रवादाने प्रेरित आहे. परंतु आज देश तोडण्याची भाषा करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानले जात असून ही फारच विचित्र परिस्थिती आहे. कायदा अथवा राज्यघटनेत कुठेही याची परवानगी नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे देशाच्या राजधानीत हे सर्व घडत आहे. जेटली दिल्ली भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करीत होते. (वृत्तसंस्था)पक्ष कार्यकर्त्यांना अनुसूचित जाती जनजातीचे लोक आणि महिलांमध्ये जाण्याचे आवाहन करताना जेटली यांनी सांगितले की, सरकार येत्या काही दिवसातच स्टँडअप इंडिया योजना सुरू करणार आहे. याअंतर्गत बँकेच्या प्रत्येक शाखेतून अनुसूचित जाती जनजाती आणि महिलांना मोठे उपक्रम आणि उद्योग सुरू करण्यासाठी एक कोटी रुपयांपर्यत कर्ज दिले जाईल.