शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत, हरयाणातील पराभवावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
3
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
4
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
5
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
6
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
7
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
8
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
9
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
10
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट
11
जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्तींच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात! गेल्या निवडणुकीपर्यंत होता सर्वात मोठा पक्ष, पण आता...
12
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
13
बाहेरुन स्पा सेंटर पण...! जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला; मुलांसह ५ मुली ताब्यात, Video Viral
14
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
15
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
16
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
17
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
18
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
19
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
20
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव

४२ वर्षापूर्वीचा काळा दिवस!...तेव्हा ट्रेनचे ९ डबे नदीत बुडाले होते; ८०० जणांचा झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 9:12 AM

या दुर्घटनेत अनेक प्रवाशांचे मृतदेह कित्येक दिवस ट्रेनच्या बोगीमध्येच अडकले होते.

सहरसा - ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. याठिकाणी बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाली. या दुर्दैवी अपघातात आतापर्यंत २३७ लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत. परंतु हा देशातील पहिला मोठा अपघात नव्हे तर भारतात याआधीही अनेक भीषण रेल्वे अपघात झाले आहेत. ४२ वर्षापूर्वी बिहार रेल्वे अपघात, ज्याला देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात मानले जाते. 

हा दिवस होता ६ जून १९८१..प्रवाशांनी खचाखच भरलेली ट्रेन मानसी-सहरसा रेल्वेमार्गावर घाट-धमारा स्टेशनजवळ बागामती नदीवर बनलेल्या पूलावर रुळावरून उलटून पडली. या ट्रेनमध्ये ९ डबे होते. ट्रेन रुळावरून घसरल्याने उफनती बागमती नदीत कोसळली. या दुर्घटनेत तब्बल ८०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून १९८१ ला मानसीपर्यंत ट्रेन नेहमीसारखी पुढे गेली. परंतु दुपारीच्या ३ च्यानंतर धमारा घाटाहून ट्रेन पुढे गेली. काही वेळाने वातावरण खराब झाले, मुसळधार पाऊस पडत होता. ट्रेन वेगाने जात होती. अचानक ड्रायव्हरने ब्रेक दाबला त्यामुळे पॅसेंजर ट्रेनचे ९ डबे बागामती नदीत पडले. 

अनेक प्रवाशांचे मृतदेह कित्येक दिवस ट्रेनच्या बोगीमध्येच अडकले होते. या अपघातातील मृतांची संख्या सरकारी आकडेवारीनुसार ३०० होती परंतु स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेत ८०० च्या आसपास लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात म्हणून आठवले जाते. या दुर्घटनेबाबत अनेक गोष्टी त्यानंतर बाहेर आल्या. ट्रेन बागामती नदी ओलांडत असताना ट्रॅकवर अचानक गाय आणि म्हैशीचा झुंड आला त्यांना वाचवण्याच्या नादात ड्रायव्हरने ब्रेक दाबला. 

तर काहींच्या मते, मुसळधार पावसामुळे ट्रेनमधील सर्व प्रवाशांनी दारे, खिडक्या बंद केले होते. त्यामुळे वेगवान वारे वाहताना त्याचा दबाव ट्रेनच्या डब्यावर पडला आणि डबे नदीत पडले. परंतु ड्रायव्हरने ब्रेक का दाबला याचा खुलासा आजपर्यंत झाला नाही. हा देशातील पहिला मोठा रेल्वे अपघात होता तर जगातील दुसरा सर्वात मोठा रेल्वे अपघात होता. जगातील सर्वात मोठा रेल्वे अपघात श्रीलंकेत २००४ मध्ये झाला. जेव्हा सुनामीमुळे ओसियन क्वीन एक्सप्रेसचा अपघात झाला. ज्यात १७०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला.  

टॅग्स :railwayरेल्वे