शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना 4 दिवसांत नोकरी; महापालिकेचं संवेदनशील पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 15:27 IST

महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा 4 सप्टेंबरला कर्तव्य बजावताना मृत्यू

मुंबई: गेल्या आठवड्यात शहरात झालेल्या मुसळधार पावसात कर्तव्य बजावत असताना मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरीत सामावून घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अवघ्या चार दिवसांमध्ये पालिकानं याबद्दलची कार्यवाही केली. बृहन्मुंबई महापालिकेच्या 'पी दक्षिण विभागाचे कर्मचारी जगदीश परमार (५४) आणि विजेंद्र बागडी (४०) या दोन कर्मचाऱ्यांचा 4 सप्टेंबरला मृत्यू झाला. अतिवृष्टीत कर्तव्य बजावत या दोन कर्मचाऱ्यांना मृत्यूनं गाठलं. याबाबत महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका वारसाला महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करण्याचं आणि नियमानुसार कर्मचाऱ्याची देणी देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचं आदेश संबंधित खात्याला दिले होते.यानंतर सहआयुक्त अशोक खैरे, पी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती चंदा जाधव आणि घन कचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता अशोक यमगर यांनी काल जगदीश परमार आणि विजेंद्र बागडी यांच्या कुटुंबातील एका वारसाला नोकरीचं नियुक्ती पत्र आणि  आज सफाई कामगार विमा योजनेंतर्गत रुपये एक लाख एवढ्या रकमेचा धनादेश  सुपूर्द केला. बुधवारी (4 सप्टेंबर) झालेल्या अतिवृष्टी दरम्यान नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेचे ३२ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत होते. त्यावेळी पी दक्षिण विभागातील कामगार जगदीश परमार यांचं कर्तव्य बजावताना निधन झालं. तसंच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगार विजेंद्र बागडी हे कर्तव्यावर असताना तोल जाऊन वाहत्या पाण्यात पडले. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ बाहेर काढून त्वरित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सर्वोपचार रुग्णालयात' नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 

टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका