शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

Border standoff: पँगाँग लेक परिसरातून भारत-चीनचे सैनिक मागे हटण्यास सुरूवात; चिनी माध्यमाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 19:32 IST

Border standoff : यापूर्वी दोन्ही देशांची नवव्या टप्प्यातील फेरी सकारात्मक झाल्याची देण्यात आली होती माहिती. सैनिक मागे हटण्यावर भारताकडून प्रतिक्रिया नाही.

ठळक मुद्देगेल्या वर्षी दोन्ही देशांमध्ये वाढला होता तणावभारत चीनदरम्यान नवव्या टप्प्यातील चर्चा झाली होती सकारात्मक

गेल्या वर्षी मे महिन्यापासूच भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यानंतर हा वाद सोडवण्यासाठी देशातील सैन्य आणि राजकीय स्तरावरही अनेक चर्चा पार पडल्या आहेत परंतु आता पँगाँग लेकच्या दक्षिण आणि उत्तर भागातून भारत आणि चीन आपलं सैन्य मागे परतत असल्याचा दावा चिनी प्रपोगंडा पसवणारं वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं केला आहे. दरम्यान, चीनच्या या दाव्यावर भारतानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही."भारत आणी चीनच्या कमांडर स्तरावर झालेल्या नवव्या टप्प्यातील चर्चेत दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या सहमतीनुसार चीन आणि भारत बॉर्डर ट्रुप्सनं बुधावारी पँगाँग लेकच्या उत्तर आणि दक्षिण भागातून मागे हटण्यास सुरूवात केली आहे," असा दावा ग्लोबल टाईम्सनं चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्यानं केला आहे.  सीमेवरील वातावरणाबाबत २४ जानेवारी रोजी भारत आणि चीनच्या दरम्यान नवव्या टप्प्यातील चर्चा पार पडली. यावेळी दोन्ही देशांच्या मध्ये असलेल्या सीमेच्या परिसरातून सैनिकांची माघार घेण्याची प्रक्रिया अधिक जलद करण्यावर आणि पूर्व लडाख क्षेत्रात परिस्थिती नियंत्रणात आणि स्थिर करण्यावर एकमत झालं होतं. भारतीय लष्करानंही ही बाब सकारात्मक असल्याचं सांगितलं होतं. तसंच संरक्षण मंत्रालयानंही यानंतर याबाबत माहिती देत नवव्या टप्प्यातील चर्चा सकारात्मक राहिल्याचं म्हटलं होतं. तसंच दोन्ही बाजूनं सैनिक हटवण्यावर सहमती झाली आहे. याव्यतिरिक्त दोन्ही बाजूंनी चर्चा सुरूच राहतील. तसंच तणाव कमी करण्यासाठी दहाव्या टप्प्याची चर्चाही करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. कडाक्याच्या थंडीतही सैनिकांची तैनातीसध्या लष्कराचे ५० हजारांपेक्षा अधिक सैनिक शून्य पेक्षाही कमी तापमानात देशाच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आले आहे. तर दुसरीकडे चीननंही आपले सैनिक त्या ठिकाणी तैनात केले आहे. पँगाँग लेक आणि आसपासचा परिसर रणनितिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. सुरुवातीला दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्यानंतर भारतानं त्या ठिकाणी गस्त वाढवली होती. 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवानladakhलडाख