शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सरपंचाच्या हत्येप्रकरणी पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बबन गित्ते यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल
2
एनडीएचे खासदार नाराज? पुन्हा लोकसभेची निवडणूक लागणार? शरद पवारांचे महत्वाचे वक्तव्य
3
अजित पवारांना बालेकिल्ल्यातच धक्का; १६ माजी नगरसेवक रात्री शरद पवारांच्या भेटीला!
4
मागच्या ६ महिन्यांत मला अनेकदा रडू वाटलं, पण...; वर्ल्ड कप विजयानंतर हार्दिक पांड्याच्या शब्दांनी सर्वच भावुक!
5
रोहितला एक व्यक्ती म्हणूनही मिस करेन; द्रविड भावूक, पण एक खदखद बोलून दाखवली
6
सुनीता विल्यम्स अंतराळातून परत कधी येणार? ISRO प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली मोठी अपडेट
7
नीट : गुजरातमध्ये छापासत्र! पेपरफुटीप्रकरणी चार जिल्ह्यांत सात ठिकाणी कारवाई
8
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली होती 'या' प्रसिद्ध गाण्याला चाल; अख्ख्या देशाला लावलं होतं वेड!
9
धक्कादायक! लोकांना करता येईना ई-मेल अन् कॉपी पेस्ट; ५६% भारतीय मोबाइलवर करताहेत टाइमपास
10
रोहित-कोहलीचे अभिनंदन, सूर्याच्या कॅचचे कौतुक, द्रविडचे आभार; PM मोदींकडून कौतुकाचा वर्षाव
11
आषाढी पायी वारी : अलंकापुरीतून माउलींच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
12
भारताने T20 WC जिंकताच बिग बींचे डोळे पाणावले; म्हणतात - "भारत माता की जय..!"
13
अर्थसंकल्पाच्या श्रेयाची मित्रपक्षांमध्ये पळवापळवी! मुख्यमंत्र्यांच्या नावे योजनांमुळे शिंदेसेनेला बळ
14
दोन दशकं भिंत म्हणून राहिला अन् आज..; T20 WC जिंकताच क्षितीजची राहुल द्रविडसाठी खास पोस्ट
15
'धर्म मला मार्गदर्शन करतो'; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऋषी सुनक यांनी नारायण मंदिरात दर्शन घेतले
16
ज्येष्ठांना सरकारी खर्चाने तीर्थक्षेत्र दर्शन घडवणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
17
नीट : आता बीड रडारवर, सात विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्रे; पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात 
18
T20 World Cup 2024 Prize Money: T20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडिया बनली मालामाल! दक्षिण आफ्रिकेने पराभवानंतरही केली करोडोंची कमाई
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० जून २०२४: आजचा दिवस पूर्णतः अनुकूल व लाभदायी, मित्रांकडून लाभ होईल!
20
चक दे इंडिया! भारताच्या पुरूष संघानं 'जग' जिंकलं; टीम इंडियाच्या 'नारी शक्ती'चा एकच जल्लोष

गुलाम अलींनंतर आता पाकिस्तानी पहलवानांवरही बहिष्कार

By admin | Published: October 10, 2015 3:11 PM

भारत-पाकिस्तनमधील तणावपूर्ण संबंधांमुळे प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली खान यांचा भारतातील कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे वाद सुरू असतानाच आता भारताने पाकिस्तानी पहलवानांवरही बहिष्कार टाकला आहे.

ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. १० - भारत-पाकिस्तनमधील तणावपूर्ण संबंधांमुळे प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली खान यांचा भारतातील कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे सुरू असलेला वाद ताजा असतानाच आता भारताने पाकिस्तानी पहलवानांवरही बहिष्कार टाकला आहे. वैष्णोदेवी येथे नवरात्रीदरम्यान दंगल आखाड्यात होणा-या कुस्ती स्पर्धेसाठी पाकिस्तानी पहलवानांना आमंत्रणच देण्यात आलेले नाही. 
या स्पर्धेचे आयोजक शिवकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी या स्पर्धेसाठी पाकिस्तानी पहलवानांना निमंत्रित करण्यासंबंधीचे निवेदन देण्यात आले होते व ते मंजूर झाल्यानंतर व्हिसाही मिळाला होता, पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने पाकिस्तानी पहलवानांना स्पर्धेसाठी न बोलावण्याची सल्ला दिला. यावर्षीही दोन्ही देशांतील संबंध बिघडलेलेच असल्याने पहलवानांना स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले नाही, असे शर्मा यांनी सांगितले. 
भारताची १९४७ साली फाळणी झाल्यानंतर २००५ साली पहिल्यांदाच पाकिस्तानी पहलवानांना दंगल स्पर्धेसाठी निमंत्रण देण्यात आले होते, त्यानंतर २०१०२ पर्यंत दरवर्षी त्यांना स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात येत असे. भारत व पाकिस्तानच्या या पहलवानांदरम्यान रंगणारा कुस्तीचा हा खेळ खूप लोकप्रिय झाला होता व तो पाहण्यासाठी लोक लांबून येत असतं, असे शर्मा म्हणाले.
२०१२ साली पेशावरमध्ये भारतीय पहलवानांची डंका वाजला होता, त्यावेळी पाकिस्तानी नागरिकांनी त्यांची खूप खातीरदारीही केली होती. मात्र २०१३ साली भारतीय सैनिकांचे शीर कापण्यात आल्याच्या घटनेनंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आणि पाकिस्तानी पहलवान या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाहीत.
त्यानंतर गेली दोन वर्ष हा सिलसिला कायम असला तरी पुढील वर्षी त्यांना या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन शर्मा यांनी दिले. भविष्यात केंद्र व राज्य सरकार दोन्ही देशातील कलाकार, खेळाडूंना एकमेकांच्या देशाता जाण्यास परवानगी देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.