शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

भुताटकीच्या संशयावरून आदिवासी कुटुंबावर बहिष्कार

By admin | Published: September 04, 2015 11:49 PM

नाशकातील घटना : घरावर हल्ला, तोडफोड

नाशकातील घटना : घरावर हल्ला, तोडफोड
नाशिक : भुताटकी करत असल्याच्या संशयावरून गावातून बहिष्कृत केलेल्या आदिवासी कुटुंबाला जीव वाचविण्यासाठी २१ दिवसांपासून रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. बागलाण तालुक्यातील मानूर खैराडपाडा येथील पंडित बहिरम या आदिवासी कुटुंबावर हा हृदयद्रावक प्रसंग गुदरला आहे.
येथील जिवतूबाई व पंडित बहिरम हे आपल्या मंगळ्या, रमेश व तुळशी या मुलांबरोबर राहात होते. दीड बिघे जमीन कसून ते उदरनिर्वाह करत होते. गेल्या ऑगस्ट महिन्यात पंडित यांच्या घराजवळच राहणारा त्यांचा धाकटा भाऊ पंढरीनाथ याची मुलगी संगीता (१०) तापाने फणफणली होती. ताप उतरत नसल्यामुळे सोमा महाराज या बाबाला पाचारण करण्यात आले. १३ ऑगस्टच्या रात्री संगीतावर सोमाने अघोरी विद्येचा वापर सुरू केला. मात्र वैद्यकीय उपचाराअभावी ताप थेट मेंदूत गेल्याने संगीताची प्राणज्योत मालवली. सकाळी अचानक सोमाच्या अंगात आले. त्याने तुमच्या घरात जिवतूबाई ही भुतीण आहे. तिने आतापर्यंत अकरा जणांना खाल्ले असून, आता संगीताचा बळीही तिने घेतल्याचे सांगितले. त्यामुळे संगीताच्या मृतदेहाजवळच सख्ख्या भावासह गावकरी जिवतूबाई, पंडित दाम्पत्यावर तुटून पडले. बचावासाठी हे दाम्पत्य तिन्ही मुलांसह घरात लपून बसले. मात्र गावकर्‍यांनी घरावर दगडफेक करून कुर्‍हाडीने दरवाजा तोडून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी दरवाजाने जंगलात पळ काढून जीव वाचवला.(प्रतिनिधी)
-----------------------------
पोलीस यंत्रणा उदासीन
बहिरम कुटुंबीयाने त्याच रात्री डांगसौंदाणे पोलीस औट पोस्ट गाठत बेतलेला प्रसंग कथन केला. मात्र साहाय्यक पोलीस निरीक्षक जी. के. वनारे, हवालदार अनिल अहिरे यांनी तक्र ार घेण्याऐवजी त्यांना राज्य सोडण्याचा सल्ला दिला.