शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

खळबळजनक! "काठ्या घेऊन रॅलीत या"; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा व्हिडिओ व्हायरल

By देवेश फडके | Updated: January 27, 2021 12:34 IST

दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मोठा हिंसाचार झालेला पाहायला मिळाला. या हिंसाचारानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी नेते राकेश टिकैत यांचा व्हिडिओ व्हायरललाठ्या-काठ्या घेऊन रॅलीत येण्याचे सांगत असल्याचे उघडहिंसाचारात सामील असणाऱ्यांवर कारवाई करणार - राकेश टिकैत

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मोठा हिंसाचार झालेला पाहायला मिळाला. या हिंसाचारानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात राकेत टिकैत शेतकऱ्यांना लाठ्या-काठ्या घेऊन रॅलीत येण्यास सांगताना दिसत आहेत. या व्हिडिओनंतर एकच खळबळ उडाली असून, राकेश टिकैत शेतकऱ्यांना भडकवत असल्याचा आरोप केला जात आहे. 

राकेश टिकैत काय म्हणाले?

या व्हिडिओमध्ये राकेश टिकैत म्हणाले की, सरकार काही झाले तरी ऐकत नाही. आडमुठेपणा करत आहे. आपला झेंडा घेऊन या. झेंडाही आणायचा आहे. लाठ्या-काठ्याही आणायच्या आहेत. सर्व गोष्टी समजून जा. तिरंगाही लावायचा आहे, आपला झेंडाही लावायचा आहे. आता सर्वांनी यायचे आहे. आपल्या जमिनी वाचत नाही. आपल्या जमिनी वाचवायचा सर्वांनी या. अन्यथा जमिनी वाचणार नाहीत. जमिनी हिसकावून घेतल्या जातील, असे राकेश टिकैत या व्हिडिओमध्ये सांगताना पाहायला मिळत आहेत. 

काठ्या शस्त्र नाहीत - राकेश टिकैत

राकेश टिकैत यांचा हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना राकेश टिकैत म्हणाले की, हा व्हिडिओ माझाच आहे, हे मी स्वीकारतो. मात्र, काठ्या हे काही शस्त्र नाही. काठीशिवाय झेंडा कसा लावणार. झेंडा लावण्यासाठी काठ्या आणायला सांगितल्या होत्या, असे राकेश टिकैत यानी स्पष्ट केले. 

हिंसाचारात सामील असलेल्यांवर कारवाई करणार

ज्या व्यक्तीने झेंडा फडकावला, ती कोण होती? एका समुदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. काही लोकांना भडकवण्यात आले आहे. त्यांना आंदोलन सोडावे लागेल. ज्या व्यक्तींचा हिंसाचाराशी संबंध असल्याचे सिद्ध होईल, त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे राकेत टिकैत यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीमध्ये प्रवेश केला आणि लाल किल्ल्यावर गोंधळ घातला. आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न केला. एवढेच नाहीतर अनेक आंदोलकांनी पोलिसांना मारण्याचाही प्रयत्न केला. रात्री उशीरा सर्व आंदोलकांना लाल किल्ल्यावरून बाहेर काढण्यात आले. 

राजधानी दिल्लीतील हिंसाचारानंतर कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीला छावणीचे स्वरुप आल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांसोबत 'सीआरपीएफ'च्या काही तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या हिंसाचारात सुमारे ३०० पोलीस जखमी झाले असून, या संपूर्ण प्रकरणानंतर २२ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीagitationआंदोलनdelhi violenceदिल्ली