शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

स्मार्टफोनचा अतीवापर वेळेआधी आणतं म्हातारपण

By admin | Published: July 04, 2017 10:50 AM

स्मार्टफोन फक्त एक संपर्काचं साधन राहिलं नसून आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - स्मार्टफोन फक्त एक संपर्काचं साधन राहिलं नसून आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. महत्वाचं म्हणजे आपण पुर्णपणे स्मार्टफोनवर अवलंबून असतो. अगदी फोन करण्यापासून ते मोठे व्यवहार करण्यापर्यंत सर्व काही एका स्मार्टफोनवरुन करता येत. नेमकं याचमुळे स्मार्टफोन खिशात असणं म्हणजे स्मार्ट असण्याचं लक्षण समजलं जातं. मात्र याची दुसरी बाजूही आहे जी सर्वांसाठी धोकादायक आहे. स्मार्टफोन जितका उपयोगी आहे तितकाच तो आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. 
 
स्मार्टफोनचा अतिवापर आपल्याला वृद्धावस्थेकडे घेऊन जात आहे. स्मार्टफोनमुळे तरुणपणातच लोक 80 वर्षाच्या म्हाता-याप्रमाणे चालू, वागू लागतात. सोबतच शारिरीक आजारही उद्भवत आहे. यामध्ये सर्वात जास्त कंबर आणि मानेच्या वेदनेचा समावेश आहे. 
 
वैज्ञानिकांनी 21 जणांवर सर्व्हे केला. सर्व्हे करताना सर्वांवर आय ट्रॅकरच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली होती. यावेळी त्यांच्या 252 हालचालींचं निरीक्षण करण्यात आलं. सर्व्हे करत असताना 46 टक्के लोक चालताना स्मार्टफोनचा वापर करत असल्याचं लक्षात आलं. मेसेज वाचायचा असो किंवा टाईप करायचा असो, तसंच फोनवर बोलताना लोक स्मार्टफोनचा वापर करत होते. चालताना स्मार्टफोनचा वापर केल्यास चालण्याचा वेग कमी होतो, आणि एखाद्या 80 वर्षाच्या म्हाता-याप्राणे लोक चालू लागतात.  
 
संशोधक डॉ टिमिस यांनी सांगितलं की, सर्व्हे करत असताना एका व्यक्तीला पाहिलं असता ही गोष्ट माझ्या लक्षात आली. ती व्यक्ती माझ्या पुढे चालत होती तेव्ही तो दारु पिऊन चालत असावा असा मला संशय आला. मात्र मी पुढे जाऊन पाहिलं तर तो चालता चालता स्मार्टफोनचा वापर करत होता. 
 
जगभरात स्मार्टफोन युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांची आकडेवारी पाहता अनेक देशांनी स्मार्टफोन युजर्सना वेगवेगळ्या सुविधा देण्यासही सुरुवात केली आहे. म्हणजे सांगायचंच झालं तर, चीनमध्ये अशा लोकांसाठी खास वेगळा फूटपाथच तयार करण्यात आला आहे. जेणेकरुन स्मार्टफोन युजरला चालताना कोणताही त्रास होणार नाही. तर नेदरलँडमध्येही अशाच प्रकारची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. इतकंच नाही, तर प्लस वनने केलेल्या सर्व्हेत स्मार्टफोनमुळे नात्यांमध्ये दुरावा येत असल्याचं समोर आलं होतं. जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोनमध्ये घालवत असल्याने अनेक नाती संपत असल्याचं सर्व्हेत सांगण्यात आलं होतं.