शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

ग्रामपंचायतींना मिळणार ब्रॉडबँड

By admin | Published: February 04, 2015 1:48 AM

ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार उपग्रह तंत्रज्ञान, पायलट विरहित विमान किंवा विशेष बलुन्सचा वापर करू शकते, अशी माहिती दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.

नवी दिल्ली : देशातील सगळ्या अडीच लाख ग्रामपंचायतींना नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क (एनओएफएन) प्रकल्पांतर्गत ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार उपग्रह तंत्रज्ञान, पायलट विरहित विमान किंवा विशेष बलुन्सचा वापर करू शकते, अशी माहिती दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. ते मंगळवारी डिजिटल इंडिया समीटमध्ये येथे बोलत होते.रविशंकर प्रसाद म्हणाले,‘‘ आम्हाला प्रत्येक ग्रामपंचायतपर्यंत पोहोचायचे आहे. तुम्ही जर निश्चित असा प्रस्ताव घेऊन आलात तर आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा पर्याय खुला ठेवला असून त्याकामी तांत्रिक समिती मदत करील.’’एनओएफएन अंतर्गत डिसेंबर २०१६ पर्यंत अडीच लाख ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे. या योजनेचा अंदाजे खर्च ३० हजार कोटी रुपये आहे. प्रसाद म्हणाले की,‘‘जेथे शक्य असेल तेथे खोदकाम करून केबल टाकल्या जातील. जेथे शक्य असेल तेथे आम्ही उपग्रह किंवा ड्रोनचा वापर करू. आम्ही अनेक पर्याय खुले ठेवले आहेत.’’ उद्योग क्षेत्रांतून आलेल्या सूचनांना रविशंकर प्रसाद उत्तर देत होते. ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड देण्यासाठी उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करता येण्याची शक्यता तपासून बघायला हवी, अशी सूचना उद्योग वर्तुळातून करण्यात आली होती. सरकारने चालू आर्थिक वर्षअखेर ५० हजार ग्रामपंचायतींना आॅप्टिकल फायबर नेटवर्क देण्याचे लक्ष्य ठरविले आहे.