शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

BRS ला मोठा झटका! ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधान परिषदेचं संख्याबळ वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 11:58 IST

तेलंगणात काँग्रेस आमदारांच्या संख्येत वाढ, बीआरएस सोडून या आमदारांनी रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. 

नवी दिल्ली - तेलंगणात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भारत राष्ट्र समिती पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. बीआरएस पक्षाला लागलेली गळती थांबत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत ६ आमदारांनी पक्षाला रामराम केला. गुरुवारी विधान परिषदेचे ६ आमदार बीआरएस सोडून काँग्रेसमध्ये सहभागी झालेत आहे.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या आमदारांना पक्षाचं सदस्यत्व दिलं. या ६ आमदारांमध्ये विठ्ठल दांडे, भानु प्रसाद राव, एम.एस प्रभाकर, बोग्गरापु दयानंद, येग्गे मल्लेशम आणि बसवाराजू सरैया यांचा समावेश आहे. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर ६ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आगामी काळात आणखी काही आमदार सत्ताधारी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

२ दिवसांपूर्वी बीआरएसला मोठा धक्का बसला होता. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार के केशव राव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत केशव राव यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. तेलंगणात झालेल्या पराभवानंतर बीआरएस पक्षाचे आमदार सातत्याने पक्ष सोडत आहेत. त्याशिवाय हैदराबादच्या महापौर विजया लक्ष्मी आर गडवाल यांच्यासह पक्षातील इतर नेत्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीत BRS ला फटका

मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण १९९ जागांपैकी बीआरएसला फक्त ३९ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसनं ६४ जागा जिंकत राज्यात सत्ता मिळवली. सिंकदराबाद कॅन्टोन्मेंटच्या बीआरएसच्या आमदार जी लास्या नंदिता यांचं यावर्षीच्या सुरुवातीला रस्ते अपघातात निधन झाले. त्यानंतर या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली. त्यामुळे काँग्रेस आमदारांची संख्या ६५ झाली.

विधान परिषदेचं संख्याबळ वाढलं

तेलंगणा वेबसाईटनुसार, विधान परिषदेत सध्या बीआरएसकडे २५ सदस्य आहेत तर काँग्रेसचे ४ सदस्य आहेत. ४० सदस्यीय विधान परिषदेत ४ नामनिर्देशित सदस्य आहेत. ऑल इंडिया मजलिस इ इत्तेहादुल मुस्लिमीनचे २, भाजपा आणि पीआरटीयूचे १-१ आणि अपक्ष १ असे सदस्य आहेत. तर २ जागा रिक्त आहेत. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे गुरुवारी तेलंगणात परतताच याठिकाणी बीआरएसच्या ६ सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस आमदारांचं संख्याबळ १० इथपर्यंत वाढलं आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीTelanganaतेलंगणा