शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बीएसएफ अलर्ट, घुसखोरीचा मोठा कट उधळला; २४ हून अधिक बांगलादेशींना हाकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 21:36 IST

भारत-बांगलादेश सीमेवर बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न बीएसएफने उधळून लावला आहे. सैनिकांनी २४ हून अधिक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मागे ढकलले आहे.

बांगलादेशात काही दिवसापूर्वी शेख हसीना यांचे सरकार सत्तेतून गेले. नवीन  मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले, तेव्हापासून भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचे प्रयत्न सतत सुरू आहेत. दरम्यान, भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना मोठे यश मिळाले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या दक्षिण बंगाल फ्रंटियरच्या विविध बटालियनच्या सतर्क सैनिकांनी बंगालच्या उत्तर २४ परगणा आणि नादिया जिल्ह्यांमधील भारत-बांगलादेश सीमेवर वेगवेगळ्या कारवाईत बेकायदेशीर घुसखोरीचे मोठे प्रयत्न उधळून लावले आणि एकूण २४ बांगलादेशी आणि दोन रोहिंग्यांना अटक केली.

'नेहरू अपघाताने पंतप्रधान झाले; सरदार पटेल, डॉ. आंबेडकर पात्र होते'- मनोहर लाल खट्टर

या प्रकरणाबाबत बीएसएफने रविवारी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, हे सर्व घुसखोर वेगवेगळ्या सीमावर्ती भागातून बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. याशिवाय, जवानांनी सीमेवर तस्करीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले आणि बंदी घातलेल्या फेन्सेडिल कफ सिरपच्या ५६५ बाटल्या आणि तीन किलो गांजा, तसेच २,९०० क्विनाइन सल्फेट गोळ्या, ७०० इंजेक्शन आणि १,२०० आर्टिमेथर इंजेक्शनची मोठी खेप जप्त केली. याशिवाय ११ गुरेही तस्करीपासून वाचविण्यात आली.

बीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी जवानांनी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून २० बांगलादेशी आणि दोन रोहिंग्या आणि नादिया सीमेवरून चार बांगलादेशींना बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना पकडले आणि परत हाकलून लावले. घुसखोर घरकाम आणि मजुरीच्या कामासाठी मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादला जात होते. बांगलादेशकडून घुसखोरीचे सतत प्रयत्न होत आहेत, पण सतर्क सैनिक त्यांचे मनसुबे हाणून पाडत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सैनिकांनी तीन गुरे तस्करीपासून वाचवली

इतर घटनांमध्ये, मालदा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या ११९ व्या बटालियनच्या महदीपूर, गोपालनगर, सबदलपूर आणि नवादा या सीमा चौक्यांच्या सैन्याने त्यांच्या संबंधित जबाबदारीच्या क्षेत्रातून वेगवेगळ्या कारवाईत ५६५ बाटल्या फेन्सेडिल जप्त केल्या, असे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय, ८८ व्या बटालियनच्या पन्नापूर सीमा चौकीच्या सैनिकांनी आठ गुरे वाचवली आणि ११५ व्या बटालियनच्या सैनिकांनी तीन गुरे तस्करीपासून वाचवली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBSFसीमा सुरक्षा दलBangladeshबांगलादेश