शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
2
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
3
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
4
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
5
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
6
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
7
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
8
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
9
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
10
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
11
Diwali 2024: दिवाळीत घरबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!
12
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
13
या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?
14
दिवाळीपूर्वी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडले; Midcap स्टॉक्स आपटले
15
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
16
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
17
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
18
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
19
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 
20
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 

बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी BSF बनले देवदूत; आतापर्यंत १ हजार भारतीय विद्यार्थी परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 11:26 PM

Bangladesh Protests: त्रिपुराला लागून असलेल्या बांगलादेशच्या सीमावर्ती जिल्ह्यातील ब्राह्मणबारिया मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ३६ विद्यार्थ्यांना बीएसएफनं मोठी मदत केली आहे.

बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील कोटा सिस्टम रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं हिंसक आंदोलन सुरू आहे. काही आठवड्यातच या आंदोलनाचं लोण संपूर्ण देशात पसरलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या आंदोलनात ११५ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर बांगलादेशातून जवळपास एक हजार भारतीय विद्यार्थी परतले आहेत.

त्रिपुराला लागून असलेल्या बांगलादेशच्या सीमावर्ती जिल्ह्यातील ब्राह्मणबारिया मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ३६ विद्यार्थ्यांना बीएसएफनं मोठी मदत केली आहे. दरम्यान, २० जुलै रोजी सकाळी बीएसएफच्या त्रिपुरा फ्रंटियरचे महानिरीक्षक पीयूष पुरुषोत्तम पटेल यांना बांगलादेशच्या ब्राह्मणबारिया मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा फोन आला. त्याठिकाणी अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या दुरवस्थेबद्दल त्यांना सांगण्यात आलं. तसंच इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांविषयी माहिती जाणून घेणं अवघड होत असल्याचं सांगितलं.

यानंतर आयजी बीएसएफनं कोमिल्ला येथील बॉर्डर गार्ड्स बांगलादेश (बीजीबी) च्या एरिया कमांडरशी संपर्क साधला आणि दोन्ही सीमा सुरक्षा दलांमध्ये चॅनेल अॅक्टिव्ह करण्यात आले. यानंतर बीएसएफ आणि बीजीबीने एकत्रितपणे सुनियोजित ऑपरेशन केलं. बीओपी अखुराजवळील सीमेपर्यंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची काळजी बीजीबीनं घेतली आणि त्यानंतर बीएसएफनं या विद्यार्थ्यांची काळजी घेतली. सीमेवर या विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आलं. यानंतर बीएसएफच्या गाड्यांद्वारे त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यास मदत केली.

दरम्यान, भारतानं हे हिंसक आंदोलन बांगलादेशातील अंतर्गत प्रकरण असल्याचं म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आपल्या साप्ताहिक मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की, शेजारील देशात राहणारे १५००० भारतीय सुरक्षित आहेत, ज्यामध्ये ८,५०० विद्यार्थी आहेत. तसंच, भारताचं परराष्ट्र खातं या घटनांवर लक्ष ठेवून आहे. भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बांगलादेशातून मायदेशी आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. 

दरम्यान, बांगलादेशात नोकऱ्यांमधील आरक्षण संपवण्यासाठी संतप्त आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती बिघडली आहे. बहुतांश बस, ट्रेन सेवा बंद आहेत. शाळा, कॉलेज यांनाही सुट्टी देण्यात आली आहे. बांगलादेशातील हे आंदोलन नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात आहे. काही समुहांना सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव जागा ठेवल्या जातात. हा प्रकार भेदभाव करणं आणि गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्याला सरकारी नोकरीपासून वंचित ठेवतं असा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे. 

बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये ५६ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. ज्यात ३० टक्के आरक्षण पाकिस्तानसोबत १९७१ च्या लढाईत उतरलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांसाठी आहे. त्याशिवाय १० टक्के वंचित प्रशासकीय जिल्ह्यांसाठी, १० टक्के महिला, ५ टक्के अल्पसंख्याक समुदायातून येणाऱ्या जातींसाठी तर १ टक्के आरक्षण दिव्यांगासाठी आहे. मात्र स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना दिल्या जाणाऱ्या ३० टक्के आरक्षणाला विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतStudentविद्यार्थीagitationआंदोलन