शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Budget 2020: '...तरीही यांना लाज वाटत नाही'; बजेटनंतर मोदी सरकारवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 18:06 IST

अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका

नवी दिल्ली: मोदी सरकार-२ चा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सादर केला. टॅक्स स्लॅबमध्ये बदल, एलआयसी, आयडीबीआय यांच्यातला हिस्सा विकण्याच्या घोषणा यांचा अर्थसंकल्पात समावेश आहे. एकीकडे भाजपाकडून या अर्थसंकल्पाचं कौतुक होत असताना दुसरीकडे विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीका होऊ लागली आहे. आमदार जिग्नेश मेवाणी यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे.  'सरकार देशातल्या गरीब आणि मध्यमवर्गाची जबाबदारी पूर्णपणे झटकू पाहतंय. यांना जराही शरम वाटत नाही,' अशा शब्दांत मेवाणी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर बरसले. यावेळी त्यांनी खासगीकरणाच्या मुद्द्यावरुनही सरकारवर जोरदार टीका केली. 'रेल्वे, एअर इंडिया, एलआयसीचं खासगीकरण झालं आहे. खासगीकरणासह कर कपात आणि इतर सवलती देऊन सरकार केवळ अदानी, अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींसाठी काम करत आहे,' अशी टीका त्यांनी केली.  मोदी सरकार केवळ उद्योगपतींच्या संपत्ती निर्मितीत रस असून सामान्यांशी त्यांना देणंघेणं नाही, असं टीकास्त्र मेवाणी यांनी सोडलं. 'शेतकऱ्यांचे मृत्यू, बेरोजगारी असे प्रश्न आ वासून उभे असताना मोदी सरकार खासगी कंपन्यांच्या हाती अधिकाधिक नियंत्रण देऊ पाहात आहे. कोट्यधीश आणखी श्रीमंत कसे होतील, याची सरकारला चिंता आहे. सार्वजनिक उपक्रमांवरील खर्चाला मात्र सरकारकडून कात्री लावण्यात येत आहे,' अशा शब्दांत मेवाणी यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर तोंडसुख घेतलं.

टॅग्स :budget 2020बजेटNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदीJignesh Mevaniजिग्नेश मेवानी