शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

"अर्थमंत्री हसत आहेत..., कमाल आहे..."! संसदेत राहुल गांधींच्या कोणत्या विधानावर हसल्या निर्मला सीतारमन?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 4:14 PM

निर्मला सितारान यांच्याकडे बोट दाखवत राहुल गांधी म्हणाले, "अर्थमंत्री हसत आहेत. कमाल आहे. ही काही हसण्याची गोष्ट नाही, मॅडम."

काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (29 जुलै 2024) लोकसभेत अर्थसंकल्पावर भाषण केले. यावेळी राहुल यांनी अर्थसंकल्पावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि दलित, मागास आणि गरीब वर्गाचा मुद्दा उपस्थित करत अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी काहीही नसल्याचा दावा केला. बजेटला हल्वा संबोधत राहुल गांधी म्हणाले, 20 जणांनी बजेट तयार केले आहे, यात अल्पसंख्याक आणि मागास समाजाचे केवळ दोनच लोक होते.

भाषण सुरू असतानाच राहुल गांधी अर्थमंत्री निर्मला सीतारन यांच्याकडे बोट दाखवत म्हणाले, "आपण हसत आहात, पण ही हसण्यासारखी गोष्ट नाही. राहुल म्हणाले, 20 अधिकाऱ्यांनी भारताचा अर्थसंकल्प तयार केला आहे. म्हणजेच अर्थसंकल्पाचा हल्वा वाटण्याचे काम 20 जणांनी केले आहे. आता सभापती महोदय, त्या 20 लोकांमध्ये 90 टक्के लोकांपैकी केवळ दोनच आहेत. एक अल्पसंख्यक, एक ओबीसी आणि या फोटोत एकही नाही. 'तुम्ही फोटोकडे पाठ फिरवली. त्याला फोटोमध्ये दिसण्याचीही परवानगी नव्हती. 'फोटोमध्ये आपण मागे केले. फोटोमद्ये तर येऊच दिले नाही." 

यावेळी, राहुल गांधी यांनी संसदेत फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना रोखले आणि संसदेत असे फोटो दाखवण्याची परवानगी नसल्याचे सांगितले. राहुल गांधी म्हणाले, "मला वाटत होते की, अर्थसंकल्पात जात जनगणनेच्या मुद्द्यावर चर्चा होईल. जे संपूर्ण देशाला हवे आहे. 95 टक्के लोकांना जात जनगणना हवी आहे. दलित, आदिवासी, मागास, गरीब सामान्य जाती आणि अल्पसंख्यक, या सर्वांनाच जात जनगणना हवी आहे. कारण प्रत्येकाला आपला सहभाग काय आहे आणि वाटा काय आहे? हे जाणून घ्यायचे आहे. पण सर, मी बघत आहे की, सरकार हलव्याचे वाटप करत आहे आणि तो वाटणारे केवळ 2-3% लोक असतात आणि वाटतात कुणाला तर ते केवळ 2-3% लोक."

यावेळी, निर्मला सितारान यांच्याकडे बोट दाखवत राहुल गांधी म्हणाले, "अर्थमंत्री हसत आहेत. कमाल आहे. ही काही हसण्याची गोष्ट नाही, मॅडम. ही काही हसण्याची गोष्ट नाही. ही जात जनगणना आहे. यामुळे देश बदलेल." एवढेच नाही तर, "महोदय, पद्मव्यूह किंवा चक्रव्यूहच्या लोकांना वाटते की देशातील मागासलेले लोक अभिमन्यू आहेत. देशातील मागासलेले लोक अभिमन्यू नसून अर्जुन आहेत. ते तुमचे हे चक्रव्यूह तोडून टाकतील आणि I.N.D.I.A. आघाडीने पहिले पाऊल टाकले आहे," असेही राहुल म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा